शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2024 2:25 PM

यशवंत कारखाना बंद पाडण्यापासून ते सुरू करण्यापर्यंत इतकच नाही तर कोणी काय केले असे हेवेदावे ही आता सुरू

लोणी काळभोर: यशवंत कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. यशवंत कारखाना बंद पाडण्यापासून ते सुरू करण्यापर्यंत इतकच नाही तर कोणी काय केले असे हेवेदावे ही आता सुरू झाले आहेत 

निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख तसेच हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप यांनी माधव काळभोर व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या आरोपांना खुलासा देऊन माधव काळभोर व प्रकाश मस्के यांनी सोमवारी (दि.४)पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी बोलताना प्रकाश मस्के म्हणाले की, प्रकाश जगताप यांनी यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्याअगोदर  स्वतःच्या विविध कार्यकारी सोसायट्यांची थकबाकी प्रथम भरावी अशी टीका त्यांनी केली. सिटीझन बँक बुडवली म्हणाऱ्यांनी ती कशी बुडाली याची माहिती घ्यावी.त्यावेळी प्रताप गायकवाड यांनी त्यांचे जवळच्या मित्राला बँकेतून १० लाख रुपये कर्ज देण्याची विनंती केली होती त्यावेळी बँकेने त्वरित कर्ज मंजूर करून दिले होते परंतु त्या कर्जदाराने कर्ज फेडले नसल्याने बँकेला नुकसान झाले होते. मांजरी येथील उपबाजार समितीची ५ एकर जमीन स्वतः प्रयन्त करून बिल्डरच्या घशातून बाहेर काढली त्या जमिनीवर बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर हे मच्छी बाजार सुरु करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणजे हे लोक शेतकरी बाजारास व्यापारी बाजार बनवत आहेत तेथील वाहनतळ कोणाकडे आहे याप्रकारेच बऱ्याच गोष्टी आम्हाला माहित आहेत त्या आम्ही बाहेर काढू असा इशारा प्रकाश मस्के यांनी दिला.

यावेळी बोलताना माधव काळभोर म्हणाले की, हवेली तालुका खरेदी विक्री संघावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची १ कोटी २० लाख रुपये कर्ज देणी थकबाकी असल्याने खरेदी विक्री संघाच्या मालकीचे प्लॉट हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सहभागीदारी म्हणून विकसित झाला आहे. ते कोणा मर्जीतील बिल्डरला लागेबांधे म्हणून विक्री झाले नाही. तेंव्हा बँकेचा तत्कालीन सहपालकत्व सांभाळणारे गोपाळ म्हस्के हे तुमच्या पॅनेलचे प्रचारक आहेत, या प्लॉट बाबतची कार्यवाही झाली तेंव्हा खरेदी संघावर संचालक कोण होते, त्यावेळी आपण कोणाची कारकूनी करत होता. त्यावेळी आपले नेते कोण होते, आपण बाजार समितीचे सभापती झाल्यानंतर आपला अर्थिक उत्कर्ष कसा झाला हे पाहणारा संपूर्ण हवेली तालुका व संपूर्ण जिल्हा असल्याने विरोधकांचे आरोप म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज को' म्हणण्याची वेळ आली असून प्रत्येक वेळी नवा नेता शोधून राजकीय दुकान चालविणाऱ्यांनी फार म्हणणाऱ्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारु नये अशी शेलकी टिका प्रकाश जगताप यांचे नाव घेऊन माधवअण्णा काळभोर यांनी केली आहे. 

चुकीच्या कारभारामुळे कारखाना बंद : जगताप

या आरोपांना प्रतिउत्तर देताना प्रकाश जगताप म्हणाले की, संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे मागील तेरा वर्षापासून बंद पडलेला यशवंत  सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरु करत हवेली व दौंड शेतकऱ्यांना तालुक्यातील पुनरुज्जीवीत करण्याचा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास  आघाडीचा खरा प्रयत्न राहणार आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमच्या बाजुने सर्वोतोपरी प्रयत्न केले.

मात्र, विरोधकांनी जिरवाजिरवीचे राजकारण केल्याने ही निवडणुक लागली आहे. कारखाना कोणी बंद पाडला, याची जाणीव सभासदांना असल्याने या निवडणुकीत मतदार अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला विजयी करतील, असा विश्वास हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेLoni Kalbhorलोणी काळभोरElectionनिवडणूक