शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

देशात सध्या चुकीचे नेतृत्व, काहीही घडू शकते - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 11:56 IST

पुणे : देशात चुकीचे नेतृत्व असल्याने सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकते. हे नेतृत्व देशात चुकीचा विचार मांडत आहे. स्वातंत्र्य ...

पुणे : देशात चुकीचे नेतृत्व असल्याने सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकते. हे नेतृत्व देशात चुकीचा विचार मांडत आहे. स्वातंत्र्य मिळवताना पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्यासारख्या नेत्यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र आणत इंग्रजांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे आपल्याला देशबांधवांमध्ये द्वेष निर्माण करण्यांविरोधात एक व्हायला हवे आणि त्यांना धडा शिकवावा लागेल, त्यांच्या विरोधात आपण उभे राहायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोंढवा येथे आयोजित ईदमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पी. ए. इनामदार, मौलाना अय्युब अशरफी, पंकज महाराज गावडे, तसेच बौद्ध, ख्रिस्ती धर्मगुरु, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशात विविधतेत एक सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून दिसायचे असल्यास या विविधतेच्या वेलीवरील सर्व फुलांचा सन्मान केला पाहिजे. पण जगभर सध्या विचित्र स्थिती आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांना मानवतेचे स्मरण राहिले नाही. आपल्या शेजारील देशांमध्येही हीच स्थिती आहे. शांतताप्रिय असलेल्या श्रीलंकेत सामान्यांना संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षात आता तेथील राज्यकर्त्यांना भूमिगत होण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले. पाकिस्तानातील राज्यकर्त्यांना केवळ भारतद्वेषाचे राजकारण करावे लागते. मात्र, तेथील सामान्य नागरिक भारतीयांच्या विरोधात नाही, तेथील लोक भारतीयांना प्रेम देतात याचा मी अनुभव घेतला आहे. त्यामुळे देशातही असे बंधूभावाचे वातावरण पुन्हा निर्माण करावे लागेल. जात, धर्म बाजूला सारून माणसांत संघर्ष होणार नाही याची खात्री करावी लागेल.

कोल्हे म्हणाले, हैदराबादचा एक नेता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन करतो. ज्याने स्वत:च्या वडिलांना, भावाला ठार मारले, असंख्य नागरिकांना कंठस्नान घातले अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते. त्यांनी सर्वांना एकत्र करत रयतेचे राज्य आणले. यावेळी मौलाना अय्युब अशरफी व पंकज महाराज गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेcongressकाँग्रेस