शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशात सध्या चुकीचे नेतृत्व, काहीही घडू शकते - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 11:56 IST

पुणे : देशात चुकीचे नेतृत्व असल्याने सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकते. हे नेतृत्व देशात चुकीचा विचार मांडत आहे. स्वातंत्र्य ...

पुणे : देशात चुकीचे नेतृत्व असल्याने सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकते. हे नेतृत्व देशात चुकीचा विचार मांडत आहे. स्वातंत्र्य मिळवताना पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्यासारख्या नेत्यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र आणत इंग्रजांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे आपल्याला देशबांधवांमध्ये द्वेष निर्माण करण्यांविरोधात एक व्हायला हवे आणि त्यांना धडा शिकवावा लागेल, त्यांच्या विरोधात आपण उभे राहायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोंढवा येथे आयोजित ईदमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पी. ए. इनामदार, मौलाना अय्युब अशरफी, पंकज महाराज गावडे, तसेच बौद्ध, ख्रिस्ती धर्मगुरु, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशात विविधतेत एक सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून दिसायचे असल्यास या विविधतेच्या वेलीवरील सर्व फुलांचा सन्मान केला पाहिजे. पण जगभर सध्या विचित्र स्थिती आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांना मानवतेचे स्मरण राहिले नाही. आपल्या शेजारील देशांमध्येही हीच स्थिती आहे. शांतताप्रिय असलेल्या श्रीलंकेत सामान्यांना संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षात आता तेथील राज्यकर्त्यांना भूमिगत होण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले. पाकिस्तानातील राज्यकर्त्यांना केवळ भारतद्वेषाचे राजकारण करावे लागते. मात्र, तेथील सामान्य नागरिक भारतीयांच्या विरोधात नाही, तेथील लोक भारतीयांना प्रेम देतात याचा मी अनुभव घेतला आहे. त्यामुळे देशातही असे बंधूभावाचे वातावरण पुन्हा निर्माण करावे लागेल. जात, धर्म बाजूला सारून माणसांत संघर्ष होणार नाही याची खात्री करावी लागेल.

कोल्हे म्हणाले, हैदराबादचा एक नेता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन करतो. ज्याने स्वत:च्या वडिलांना, भावाला ठार मारले, असंख्य नागरिकांना कंठस्नान घातले अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते. त्यांनी सर्वांना एकत्र करत रयतेचे राज्य आणले. यावेळी मौलाना अय्युब अशरफी व पंकज महाराज गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेcongressकाँग्रेस