शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशात सध्या चुकीचे नेतृत्व, काहीही घडू शकते - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 11:56 IST

पुणे : देशात चुकीचे नेतृत्व असल्याने सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकते. हे नेतृत्व देशात चुकीचा विचार मांडत आहे. स्वातंत्र्य ...

पुणे : देशात चुकीचे नेतृत्व असल्याने सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकते. हे नेतृत्व देशात चुकीचा विचार मांडत आहे. स्वातंत्र्य मिळवताना पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्यासारख्या नेत्यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र आणत इंग्रजांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे आपल्याला देशबांधवांमध्ये द्वेष निर्माण करण्यांविरोधात एक व्हायला हवे आणि त्यांना धडा शिकवावा लागेल, त्यांच्या विरोधात आपण उभे राहायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोंढवा येथे आयोजित ईदमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पी. ए. इनामदार, मौलाना अय्युब अशरफी, पंकज महाराज गावडे, तसेच बौद्ध, ख्रिस्ती धर्मगुरु, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशात विविधतेत एक सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून दिसायचे असल्यास या विविधतेच्या वेलीवरील सर्व फुलांचा सन्मान केला पाहिजे. पण जगभर सध्या विचित्र स्थिती आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांना मानवतेचे स्मरण राहिले नाही. आपल्या शेजारील देशांमध्येही हीच स्थिती आहे. शांतताप्रिय असलेल्या श्रीलंकेत सामान्यांना संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षात आता तेथील राज्यकर्त्यांना भूमिगत होण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले. पाकिस्तानातील राज्यकर्त्यांना केवळ भारतद्वेषाचे राजकारण करावे लागते. मात्र, तेथील सामान्य नागरिक भारतीयांच्या विरोधात नाही, तेथील लोक भारतीयांना प्रेम देतात याचा मी अनुभव घेतला आहे. त्यामुळे देशातही असे बंधूभावाचे वातावरण पुन्हा निर्माण करावे लागेल. जात, धर्म बाजूला सारून माणसांत संघर्ष होणार नाही याची खात्री करावी लागेल.

कोल्हे म्हणाले, हैदराबादचा एक नेता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन करतो. ज्याने स्वत:च्या वडिलांना, भावाला ठार मारले, असंख्य नागरिकांना कंठस्नान घातले अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते. त्यांनी सर्वांना एकत्र करत रयतेचे राज्य आणले. यावेळी मौलाना अय्युब अशरफी व पंकज महाराज गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेcongressकाँग्रेस