शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चिंताजनक ! उजनी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावतेय : उणे ३२.५३ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 07:00 IST

रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : पाण्याअभावी अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान

इंदापूर  : उजनी जलाशयाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत असल्याने, उजनी धरण खूपच उघडे पडलेले व भकास दिसत आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ११० टक्के भरलेले धरण सात महिन्यांतच उणे ३२.५३ टक्केपर्यंत आलेले आहे. यामुळे इंदापूर तालुका व सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

उजनीच्या पट्ट्यातील अनेक गावांतील शेतकरी यांना या संकटाचा सामना करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाण्याअभावी शेतजमिनी कोरड्या पडून बागायत पिकांचे व जनावरांच्या चाऱ्यांचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेले आहे. रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत आहे. पावसासाठी अजून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार असून, सोलापूरसह पुणे जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळी खूप कमी झाली आहे. विहिरी व बोअरवेल यांनी तर मार्च महिन्यापूर्वी तळ गाठला असल्याने पाण्याची गंभीर अवस्था उजनी पट्ट्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांना पाण्याचे नियोजन तर अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे. चौकट    उजनीच्या कालवा व बोगद्याचे तोंड सध्या बंद पडले असून, उजनी धरणाच्या पुढील पट्ट्यात पंढरपूर, सांगोला या भागात शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता पाऊस पडल्यानंतरच, धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर पुढे कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे.चौकट    सध्या उजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे. एकूण टीएमसी ४६.२३ आहे. तर उपयुक्त टीएमसी उणे १७.४३ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता. तर यंदा तेच धरण  उणे मध्ये  गेले आहे.____________________________________________

टॅग्स :Ujine Damउजनी धरणWaterपाणीdroughtदुष्काळFarmerशेतकरी