शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

जागतिक प्राणी दिन विशेष , देवराई टिकली, तर टिकेल वन्यजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 6:31 AM

देवासाठी राखून ठेवलेले वन म्हणजे ‘देवराई’ या श्रद्धेमुळे देवरायांमध्ये प्राणी, हजारो वर्षांची झाडे, औषधी वनस्पती जतन राहिल्या आहेत.

नीलेश काण्णवघोडेगाव : देवासाठी राखून ठेवलेले वन म्हणजे ‘देवराई’ या श्रद्धेमुळे देवरायांमध्ये प्राणी, हजारो वर्षांची झाडे, औषधी वनस्पती जतन राहिल्या आहेत. देवरायांमध्ये वाढणाºया वनस्पती व प्राण्यांना इजा पोहचल्यास देवाचा कोप होतो, अशी समजूत लोकांमध्ये आहे. यामुळे माणुस आणि निसर्ग यांचे नाते टिकून आहे. या देवरायांमध्ये अनेक प्राणी, पशुपक्षी, किटकांचा अधिवास आहे. या देवरायांकडे आता दुर्लक्ष होऊ लागले असून देवराया सुरक्षीत राहिल्यास हजारो वर्षांचा ठेवा जतन राहणार आहे.

भारतात अंदाजे चौदा हजार तर महाराष्ट्रात चार हजार देवराई असल्याचे केंद्र सरकारच्या सीपीआर पर्यावरण शिक्षण केंद्राने केलेल्या पाहणी अहवालात म्हटले आहे. काही तज्ज्ञांच्या मते देशात एक लाखापेक्षाही जास्त देवराया आहेत. देशात हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत जास्त देवराया पाहायला मिळतात. कर्नाटक, उत्तराखंड, केरळ राज्यांमध्ये मोठ्या आकाराच्या देवराया आहेत. महाराष्ट्रात जास्त देवराया पश्चिम घाटातील पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.

या देवरायांच्या संरक्षणासाठी आदिवासी समाजाने काही नियम आखून ठेवले आहेत. या देवराईत कोणीही झाडे तोडू शकणार नाही, जळणासाठी लाकूड घेणार नाही, फळे तोडणार नाही, तसेच खाली पडलेली फळे-फुलेही कोणी घेणार नाही, असे नियम आहेत. आदिवासी समाजात फक्त उत्सवामध्ये जेवण तयार करण्यासाठी देवराईत पडलेली वाळलली लाकडे घेतली जातात. काही देवरार्इंमध्ये आदिवासी लोक चप्पल घालूनही जात नाहीत. देवराईतून वाहणारे पाणीही आदिवासी लोक चप्पल घालून ओलांडत नाहीत. देवराई राखून आदिवासी लोकांनी निसर्गाशी समतोल साधून घेतला आहे.

देवराईमध्ये असलेल्या मंदिरात स्थानिक देवतांचे वास्तव्य असते. हा देवच आपले रक्षण करतो, अशी आदिवासी लोकांची धारणा आहे. देवराईतील वाळलेले पान ही खाजगी वापरासाठी कोणी घेऊ शकत नाही. जर देवराईचे नियम मोडल्यास यातील देवता स्वप्नात येऊन, याचा जाब विचारतो, अशी समजूत आहे. याचा परिणाम खोलवर आहे. यामुळे निसर्गाची जपणूक साधली जात आहे.काही देवरायांमधून स्थानिक लोकांना विशिष्ट काळात, विशिष्ट दिवशी, विशिष्ट कामासाठी वस्तु घेण्याची परवानगी आहे. थोडक्यत काही देवरार्इंमध्ये एका कुटुंबाला एकच बांबू घेण्याची परवानगी आहेत.देवरायांच्या संरक्षणात शासनाचे लक्ष हवेया देवरायांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने लक्ष दिले पाहिजे. देवराया टिकल्या तर पुरातन काळातील झाडे, वेली येथील जैवविविधता टिकेल, यातील प्राणी, पशु, पक्षी, किटक टिकतील.वन कायद्यांमध्येही यांच्या संरक्षणासाठी ठोस तरतूद नाही. काळाप्रमाणे या देवयारांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. स्थानिक लोकही नियम डावलून देवरायांमध्ये गुरे चरण्यासाठी सोडताना दिसतात.देवरायांचे महत्व पटवून त्यांचे जतन करण्यासाठी या देवराया संरक्षीत ठिकाण म्हणून जाहीर केल्या पाहिजेत.

टॅग्स :Puneपुणे