शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूनगरमधील महिलांचा पोलिसांना घेराव

By admin | Updated: April 4, 2015 05:56 IST

नेहरूनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांनी दहशत माजवली आहे. दोन दिवसांपूर्वी एका वयस्कर महिलेला घातक शस्त्रांनी मारहाण केल्यानंतर

पिंपरी : नेहरूनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांनी दहशत माजवली आहे. दोन दिवसांपूर्वी एका वयस्कर महिलेला घातक शस्त्रांनी मारहाण केल्यानंतर परिसरातील महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्या वेळी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. दोन दिवस उलटताच पुन्हा या भागात गुंडांनी घरांवर दगडफेक करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांना घेराव घातला. दहशत माजविणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली. शिवीगाळ, छेडछाड, विनयभंग, प्रसंगी मारहाण अशा पद्धतीने दहशत माजविण्याचे प्रकार नेहरूनगर, राजीव गांधी वसाहतीत वारंवार घडत आहेत. गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस ठोस पावले उचलत नाहीत. गुरुवारी छेडछाड, दमबाजी, घरांवर दगडफेक झाल्यामुळे शुक्रवारी सुमारे ४० महिलांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत धाव घेतली. गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. महिलेला झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी मनोज मसुकांत विटकर, राजू मसुकांत विटकर आणि आकाश शंकर लष्करे (तिघेही रा.नेहरूनगर) या आरोपींना अटक केली होती. तर गबऱ्या ऊर्फ हर्षल पवार आणि दिनेश माने हे दोन आरोपी फरार झाले होते.(प्रतिनिधी)