शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

राजकीय बालिश टीकांवर लक्ष न देता निर्भीड अन् निस्पृहपणे खटला चालवणार - उज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:21 IST

काम सरकारी वकील असलं तरी न्यायालयात निर्भीड आणि निस्पृहपणे बाजू मांडण्याचं असतं

पुणे: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भांत लोकमतने मुलाखत घेत निकम यांच्याशी संवाद साधला. 

- तुमची नियुक्ती व्हावी म्हणून मस्साजोगचे नागरिक, संतोष देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत ते अन्नत्याग आंदोलन करत होते. आता तुमची नियुक्ती झालेली आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आणि नागरिकांना काय आश्वासित कराल? 

निकम म्हणाले, निश्चितपणे मी ग्रामस्थ सरपंच देशमुख यांचे कुटुंबीय यांचा मनःपूर्वक आभारी आहे. कारण त्यांनी जो माझ्यावरती विश्वास आणि अतूट प्रेम दाखवलं ते निश्चित माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. मी हा खटला चालवण्यासाठी काल माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती केली. की मी खटला चालवण्यास तयार आहे त्यांनी संमती दिली. त्याप्रमाणे त्यांनी ते आदेश पारित केले. मुख्यमंत्री महोदय यांनी यापूर्वी देखील हा खटला चालवून मला सूचित केलं होत. परंतु मी त्यांना त्यावेळेला नम्रपणे नकार दिला होता. परंतु पुन्हा ग्रामस्थांचं हे हरताळा आंदोलन बघून मला अतिशय वाईट वाटलं. की आपल्यावरती एवढे लोक प्रेम करतात. आपण त्यांच्या प्रेमाला निश्चित दाद दिली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून माणुसकीच्या भावनेतून मी त्यांना सांगितलं की मी तुमचा खटला चालवेन. अर्थात माझं कामकाज हे तपास यंत्रणेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतरच सुरू होईल. त्याच्यानंतरच मला त्यावरती भाष्य करता येईल. 

- नियुक्तीनंतर विरोधकांची टीका देखील आता होऊ लागली आहे. त्यांना काही उत्तर? निकम म्हणाले, नाही जर एक चांगली टीका असती तर मी त्याला उत्तर दिलं असतं. पण ज्या पद्धतीने ते टीका करतायेत या बालिश टीका आहेत. राजकीय विरोधकांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. की आपण टीका करण्याच्या अगोदर आपला कायद्यावरचा अभ्यास देखील असला पाहिजे. त्याला कारण असं आहे.  त्यांची भ्रामक कल्पना अशी झाली आहे की सरकारी वकील म्हंटल म्हणजे सरकारसोबत असणार असं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विधीत खटल्यात हेच बाब स्पष्ट केली आहे. की सरकारी वकील हा न्यायदान कार्यामध्ये न्यायालयाला मदत करणारा एक स्वतंत्र अधिकारी असतो. जरी त्याचं नाव सरकारी वकील असलं तरी न्यायालयात निर्भीड आणि निस्पृहपणे बाजू मांडण्याचं असतं. मी आतापर्यंत जे विविध खटले चालवले. महाराष्ट्रामध्ये ते याच पद्धतीने चालवले आहेत. परंतु मी एकदा भाजपाची निवडणूक लढवली म्हणून मी वासी झालो. असं ते जे सुतावरून स्वर्ग गाठतात हे चुकीचं आहे. अर्थात मी त्यांनाही दोष देत नाही. कारण प्रत्येकाच्या आकलन शक्तीचा हा परिणाम असतो. आणि त्याच्यातून ते अजून बाहेर येतील. अशी मला आशा आहे. नाही आली तरी मला फरक पडत नाही. कारण मी अशा याच्यामुळे कुठेही नाउमेद होत नाही.

- या प्रकरणामध्ये प्रामुख्याने तीन खटले आहेत. हे तीन खटले नेमके कसे आहेत? आणि आपण लढणार कसे आहोत? 

निकम म्हणाले, हे तिघेही खटले स्वतंत्र दाखल झालेले आहेत. जो पहिला खटला खंडणीचा आहे, दुसरा मारामारीचा आहे. आणि तिसरा खुनाचा आहे. पोलीस तपास यंत्रणेने या तिन्ही खटल्यांचे चार्ज शीट दाखल केल्यानंतर माझं कामकाज सुरू होईल. 

- जेव्हापासून हे प्रकरण समोर आलंय तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अ नागरिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळतोय. तुम्ही अनेक खटले लढलेले आहात, याच्यामध्ये नेमकं आव्हान काय? 

निकम म्हणाले, याच्या काय आव्हानं आहेत हे तपास यंत्रणेच्या गुणवत्तेवरूनच सांगता येईल. आज सांगता येणं कठीण आहे. कारण CID आणि SIT हा तपास करतायेत. आता तपास कुठपर्यंत गेलेला आहे. यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. 

टॅग्स :PuneपुणेUjjwal Nikamउज्ज्वल निकमbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीadvocateवकिलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस