शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

रुग्णांच्या जीवाशी हेळसांड खपवून घेणार नाही; २ दिवसांत दोषींवर कारवाई - तानाजी सावंत

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: August 13, 2023 16:30 IST

पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणे व सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड हाेणं हे मुळीच सहन करणार नाही

पुणे : ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णांच्या जीवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल पाहून दाेषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्रीतानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना रविवारी दिली.

या रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १३ रूग्ण आयसीयु वाॅर्ड मधील तर चार रुग्ण जनरल वाॅर्ड मधील आहेत. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अदयाप गुलदस्त्यात आहे. याबाबत आराेग्यमंत्री सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याप्रकरणात नेमके काय घडलं हा विषय समजून घेऊ, त्यानंतर दोन दिवसात त्याचा अहवाल प्राप्त झाला की, त्यातील दोषींवर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाई केली जाईल.

सावंत पुढे म्हणाले की, ठाण्यातील हे हाॅस्पिटल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. परंतु, वैदयकीय शिक्षण देखील आमच्याच अंतर्गत येते. हाॅस्पिटल हे काेणाच्याही अंतर्गत येत असले तरी मृत्यू हा मृत्यूच असतो. रुग्णाच्या जिवाशी होणारी हेळसांड आम्ही काहीही झालं तरी सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

या ठिकाणी काय घडलं त्याची माहिती आम्ही घेत आहोत. रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का? ही बाबही अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणे व सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड हाेणं हे मुळीच सहन करणार नाही, अशी सक्त ताकिद देत ही घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडली की गडचिरोलीला घडली की चंद्रपूरला घडली यामध्ये कुणीही पडू नये. सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. त्यांची जबाबदारी ही शासनाची आहे. आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतली आहे. या घटनेच्या मुळाशी आम्ही जात आहोत. ज्या कुणामुळे घडलं असेल त्यावर कारवाई केली जाणारच असे तानाजी सावंत यांनी जाहीर केले.

टॅग्स :PuneपुणेTanaji Sawantतानाजी सावंतthaneठाणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल