शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भडकू लागले वणवे! सिंहगड, कात्रज घाटात वनक्षेत्राचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:38 IST

शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वणवा लागल्याने वनक्षेत्राचे नुकसान होण्याबरोबर छोटे वन्यजीव देखील नष्ट होतात

पुणे : उन्हाळा सुरू होताच वणवे लागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात सिंहगड व रविवारी रात्री कात्रज घाटातील डोंगराला मोठा वणवा लागला होता. त्यामध्ये वन्यजीव व झाडांचे नुकसान झाले आहे. वनक्षेत्रात आग लागू नये म्हणून जाळ पट्टा तयार करणे आवश्यक असून, कुठेही वणवा लागला तर वनविभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिक, वनविभाग मिळून काम करायला हवे आहे.

दरवर्षी शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वणवा लागतो. त्यामुळे वनक्षेत्राचे नुकसान तर होतेच, याशिवाय छोटे वन्यजीव देखील नष्ट होतात. दिवसेंदिवस वणवा लागल्याच्या घटना वाढत असल्याने त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. वणव्याबाबत वन्यजीव संरक्षक म्हणून कार्यरत असणारे तानाजी भोसले म्हणाले, वणवा लागू नये किंवा तो कोणीही लावू नये, यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. गावागावांमध्ये वणवे लागल्यामुळे होणारे नुकसान, लोकांना सांगितले पाहिजे. गावागावांमध्ये माहितीपत्रक छापून वणवा लावणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. यासाठी शिक्षेची तरतूद आहे, याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. असे कृत्य करताना कोणी सापडला, तर वनविभागाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. वणवा लागल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वणवा लावणारा निघून गेलेला असतो. त्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास आरोपी पुराव्यासह सापडू शकतो.

''वनविभागाने जंगलामध्ये या दिवसांमध्ये गस्त घालण्याचे प्रमाण वाढवावे व गस्त घालत असताना जो कोणी विनाकारण जंगलामध्ये फिरत असेल, त्याची झडती घ्यावी. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाकूडफाटा आणण्यासाठी महिला जात असतात. बराच वेळा त्यांना अडचणीत जायचे नसते, म्हणून त्या तिथे आग लावतात. अशांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - तानाजी भोसले, मानद वन्यजीव संरक्षक''

''वणवे लागू नयेत म्हणून फायर लाइन काढण्यात आलेल्या आहेत. तसेच वनरक्षकांची गस्तही वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही कुठे वणवा लागला तर वन विभागाला कळवावे. -प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी'' 

इथे करा संपर्क

नागरिकांनी कुठेही वणवा लागला असेल, तर त्वरित वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावरील व्यक्ती तुमच्या तक्रारीची दखल घेऊन लगेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्याची माहिती देईल. त्यामुळे त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाkatrajकात्रजTemperatureतापमानforestजंगल