शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भडकू लागले वणवे! सिंहगड, कात्रज घाटात वनक्षेत्राचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:38 IST

शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वणवा लागल्याने वनक्षेत्राचे नुकसान होण्याबरोबर छोटे वन्यजीव देखील नष्ट होतात

पुणे : उन्हाळा सुरू होताच वणवे लागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात सिंहगड व रविवारी रात्री कात्रज घाटातील डोंगराला मोठा वणवा लागला होता. त्यामध्ये वन्यजीव व झाडांचे नुकसान झाले आहे. वनक्षेत्रात आग लागू नये म्हणून जाळ पट्टा तयार करणे आवश्यक असून, कुठेही वणवा लागला तर वनविभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिक, वनविभाग मिळून काम करायला हवे आहे.

दरवर्षी शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वणवा लागतो. त्यामुळे वनक्षेत्राचे नुकसान तर होतेच, याशिवाय छोटे वन्यजीव देखील नष्ट होतात. दिवसेंदिवस वणवा लागल्याच्या घटना वाढत असल्याने त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. वणव्याबाबत वन्यजीव संरक्षक म्हणून कार्यरत असणारे तानाजी भोसले म्हणाले, वणवा लागू नये किंवा तो कोणीही लावू नये, यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. गावागावांमध्ये वणवे लागल्यामुळे होणारे नुकसान, लोकांना सांगितले पाहिजे. गावागावांमध्ये माहितीपत्रक छापून वणवा लावणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. यासाठी शिक्षेची तरतूद आहे, याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. असे कृत्य करताना कोणी सापडला, तर वनविभागाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. वणवा लागल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वणवा लावणारा निघून गेलेला असतो. त्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास आरोपी पुराव्यासह सापडू शकतो.

''वनविभागाने जंगलामध्ये या दिवसांमध्ये गस्त घालण्याचे प्रमाण वाढवावे व गस्त घालत असताना जो कोणी विनाकारण जंगलामध्ये फिरत असेल, त्याची झडती घ्यावी. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाकूडफाटा आणण्यासाठी महिला जात असतात. बराच वेळा त्यांना अडचणीत जायचे नसते, म्हणून त्या तिथे आग लावतात. अशांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - तानाजी भोसले, मानद वन्यजीव संरक्षक''

''वणवे लागू नयेत म्हणून फायर लाइन काढण्यात आलेल्या आहेत. तसेच वनरक्षकांची गस्तही वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही कुठे वणवा लागला तर वन विभागाला कळवावे. -प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी'' 

इथे करा संपर्क

नागरिकांनी कुठेही वणवा लागला असेल, तर त्वरित वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावरील व्यक्ती तुमच्या तक्रारीची दखल घेऊन लगेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्याची माहिती देईल. त्यामुळे त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाkatrajकात्रजTemperatureतापमानforestजंगल