शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भडकू लागले वणवे! सिंहगड, कात्रज घाटात वनक्षेत्राचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:38 IST

शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वणवा लागल्याने वनक्षेत्राचे नुकसान होण्याबरोबर छोटे वन्यजीव देखील नष्ट होतात

पुणे : उन्हाळा सुरू होताच वणवे लागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात सिंहगड व रविवारी रात्री कात्रज घाटातील डोंगराला मोठा वणवा लागला होता. त्यामध्ये वन्यजीव व झाडांचे नुकसान झाले आहे. वनक्षेत्रात आग लागू नये म्हणून जाळ पट्टा तयार करणे आवश्यक असून, कुठेही वणवा लागला तर वनविभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिक, वनविभाग मिळून काम करायला हवे आहे.

दरवर्षी शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या टेकड्यांवर वणवा लागतो. त्यामुळे वनक्षेत्राचे नुकसान तर होतेच, याशिवाय छोटे वन्यजीव देखील नष्ट होतात. दिवसेंदिवस वणवा लागल्याच्या घटना वाढत असल्याने त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. वणव्याबाबत वन्यजीव संरक्षक म्हणून कार्यरत असणारे तानाजी भोसले म्हणाले, वणवा लागू नये किंवा तो कोणीही लावू नये, यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. गावागावांमध्ये वणवे लागल्यामुळे होणारे नुकसान, लोकांना सांगितले पाहिजे. गावागावांमध्ये माहितीपत्रक छापून वणवा लावणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. यासाठी शिक्षेची तरतूद आहे, याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. असे कृत्य करताना कोणी सापडला, तर वनविभागाकडून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. वणवा लागल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वणवा लावणारा निघून गेलेला असतो. त्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास आरोपी पुराव्यासह सापडू शकतो.

''वनविभागाने जंगलामध्ये या दिवसांमध्ये गस्त घालण्याचे प्रमाण वाढवावे व गस्त घालत असताना जो कोणी विनाकारण जंगलामध्ये फिरत असेल, त्याची झडती घ्यावी. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाकूडफाटा आणण्यासाठी महिला जात असतात. बराच वेळा त्यांना अडचणीत जायचे नसते, म्हणून त्या तिथे आग लावतात. अशांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. - तानाजी भोसले, मानद वन्यजीव संरक्षक''

''वणवे लागू नयेत म्हणून फायर लाइन काढण्यात आलेल्या आहेत. तसेच वनरक्षकांची गस्तही वाढविण्यात आली आहे. नागरिकांनीही कुठे वणवा लागला तर वन विभागाला कळवावे. -प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी'' 

इथे करा संपर्क

नागरिकांनी कुठेही वणवा लागला असेल, तर त्वरित वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावरील व्यक्ती तुमच्या तक्रारीची दखल घेऊन लगेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्याची माहिती देईल. त्यामुळे त्यावर उपाय करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाkatrajकात्रजTemperatureतापमानforestजंगल