शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

अयोध्या दौरा का रद्द केला? राज ठाकरेंनी भावना व्यक्त करत केला मोठा गौप्यस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 12:28 PM

Raj Thackeray in Pune : मी हट्टाने तेथे जायचे ठरवले असते, तर महाराष्ट्रातील अनेक हिंदू बांधव तेथे आले असते आणि जर तेथे काही बरे वाईट झाले असते तर आमची पोरं नाहक गेली असती.

पुणे- राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर, राज्यांतील अनेक नेत्यांनी, त्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली हेती. या सर्व नेत्यांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर आणि थेट उत्तर दिले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी या दौऱ्यासंदर्भातील आपल्या भावना व्यक्त करत मोठा गौप्य स्फोटही केला. ते पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचच्या सभागृहात बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, "मी एक ट्विट केले होते, अयोध्या दौरा तुर्तास रद्द. यानंतर, अनेकांना वाईट वाटले, अनेकांना आनंद झाला आणि अनेक जण काही कुत्सितपणे बोलायला लागले. मी मुद्दामच दोन दिवसांचा बफर वेळ दिला होता. काय बोलायचे ते बोलून घ्या. मंग मी सांगेन, असा विचार केला होता. मी अयोद्धेला जाणार असल्याची तारीख जाही केली. मग प्रकरण सुरू झाले, की राज ठाकरेंना आयोध्येत येऊ देणार नाही. मी संर्व पाहत होतो. मला दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मुंबईतूनही माहिती मिळत होती. नंतर माझ्या लक्षात आले, की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकूण चालणार नाही. कारण जी रसद पुरवली गेली, त्याची सुरुवात राज्यातून झाली. माझी वारी अनेकांना खुपली, त्या सर्वांनी मिळून हा संपूर्ण डाव रचला होता," असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला.

"कारसेवा झाली तेव्हा मुलायम सिंग सरकाने आपल्या अनेक कारसेवकांना ठार मारण्यात आले होते. त्या शरयू नदीत प्रेतं तरंगताना मी दूरदर्शनवर पाहिली होती. जीथे कारसेवकांना मारले गेले. त्या ठिकाणाचे दर्शन मला घ्यायचे होते. पण असो, राजकारणात अनेकांना भावना संमजत नसतात," अशा शब्दात राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्या मागची आपली भावनाही यावेळी बोलून दाखवली.

राज्यातली माझी ही ताकद मला नाहक लावायची नव्हती -मी हट्टाने तेथे जायचे ठरवले असते, तर महाराष्ट्रातील अनेक हिंदू बांधव तेथे आले असते आणि जर तेथे काही झाले असते तर आपली पोरं तर गेली असती असती अंगावर. अनेक केसेस आल्या असत्या. त्यांना नाहक जेलमध्ये टाकले गेले असते. तो ससेमिरा लागला असता आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व प्रकरण सुरू केले गेले असते. निवडणुका लागल्या असत्या आणि तुम्ही त्या ससेमिऱ्यात अडकला असतात. यामुळे, ही राज्यातली माझी ताकद मला त्यात नाहक लावायची नव्हती. मी पोरांना अडकू देणार नाही, भलेही चार शिव्या खाव्या लागल्या तरी चालतील, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

आता जाग आली?आता जाग आली, बारा चौदा वर्षांनंतर, की राज ठाकरेंनी माफी मागितली तरच त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देऊ. पण लक्षात ठेवा यामुळे चुकीचे पायंडे पडतायत. २०१७ मध्ये गुजरातमध्ये उत्तर प्रदेश बिहारमधून कामासाठी जी लोकं गेली हेती त्यांच्या पैकी कुणाकडून तरी तेथे एका मुलीवर बलात्कार झाला. यानंतर गुजरातमधून उत्तर प्रदेश आणि बिहारच्या १० ते १५ हजार लोकांना गुजरातमधून हुसकावण्यात आले. ते मुंबईत आले आणि नंतर उत्तर प्रशेद, बिरारमध्ये गेले. त्यांना कोण माफी मागायला लावणार? ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, लाऊडस्पीक झोंबले, हे आपल्या विरोधात एकत्र येतात. इतरत्र मात्र आपसातच लढत बसणार, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPuneपुणे