शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांमध्ये भाषिक अस्मिता का दिसत नाही? श्रीपाद जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:09 IST

‘दाक्षिणात्य राज्यांमध्ये मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्यसृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले.

पुणे : ‘दाक्षिणात्य राज्यांमध्ये मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्यसृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले. परंतु १२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात भाषिक अस्मिता बाळगत कला क्षेत्रातून नेतृत्व का पुढे येत नाही, असा खडा सवाल साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला.साहित्यिक-कलावंत संमेलनात ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कलागौरव पुरस्काराचे वितरण जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना, तर साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल आॅमव्हेट यांना प्रदान करण्यात आला. या वेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप बराटे, भारत पाटणकर, सचिव वि.दा. पिंगळे, खजिनदार संजय भामरे आणि उपाध्यक्ष राजेंद्र वाघ उपस्थित होते. कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. त्यामध्ये बंडा जोशी, प्रा. वा. ना. आंधळे, भरत दौंडकर, आसावरी काकडे, संगीत म्हसकर, प्रकाश घोडके, राजन लाखे, रमजान मुल्ला, ललिता सबनीस, दिनेश भोसले, अनिल दीक्षित, संदीप जगताप, दादाभाऊ गावडे आणि रमणी सोनवणे सहभागी झाले होते.महाकोशातील निधी १ कोटीवर जाऊ शकला नाही..साहित्य संमेलनासाठीचा महाकोशातील निधी १ कोटीच्या वर जाऊ शकला नाही, याची खंत वाटते. मराठी भाषेवरच उपजीविका असलेले प्राध्यापक, शिक्षक, लेखक मंडळी सढळ हाताने मदत करीत नाहीत. दाक्षिणात्य कलाकारांनी अभिनयातील प्रतिमांचे संवाहन केले. त्यामुळेच डीएमके, जयललिता, करुणानिधींसारखे नेतृत्व उभे राहिले. राजकारण म्हणजे केवळ टाकाऊ नाही, त्याद्वारे आपण अभिरुचीसंपन्न समाज घडवू शकतो. मराठी भाषिक कलाकारांमधून असे आदर्श निर्माण झाले पाहिजेत, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे