शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कलाकारांमध्ये भाषिक अस्मिता का दिसत नाही? श्रीपाद जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:09 IST

‘दाक्षिणात्य राज्यांमध्ये मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्यसृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले.

पुणे : ‘दाक्षिणात्य राज्यांमध्ये मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्यसृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले. परंतु १२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात भाषिक अस्मिता बाळगत कला क्षेत्रातून नेतृत्व का पुढे येत नाही, असा खडा सवाल साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला.साहित्यिक-कलावंत संमेलनात ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कलागौरव पुरस्काराचे वितरण जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना, तर साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल आॅमव्हेट यांना प्रदान करण्यात आला. या वेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप बराटे, भारत पाटणकर, सचिव वि.दा. पिंगळे, खजिनदार संजय भामरे आणि उपाध्यक्ष राजेंद्र वाघ उपस्थित होते. कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. त्यामध्ये बंडा जोशी, प्रा. वा. ना. आंधळे, भरत दौंडकर, आसावरी काकडे, संगीत म्हसकर, प्रकाश घोडके, राजन लाखे, रमजान मुल्ला, ललिता सबनीस, दिनेश भोसले, अनिल दीक्षित, संदीप जगताप, दादाभाऊ गावडे आणि रमणी सोनवणे सहभागी झाले होते.महाकोशातील निधी १ कोटीवर जाऊ शकला नाही..साहित्य संमेलनासाठीचा महाकोशातील निधी १ कोटीच्या वर जाऊ शकला नाही, याची खंत वाटते. मराठी भाषेवरच उपजीविका असलेले प्राध्यापक, शिक्षक, लेखक मंडळी सढळ हाताने मदत करीत नाहीत. दाक्षिणात्य कलाकारांनी अभिनयातील प्रतिमांचे संवाहन केले. त्यामुळेच डीएमके, जयललिता, करुणानिधींसारखे नेतृत्व उभे राहिले. राजकारण म्हणजे केवळ टाकाऊ नाही, त्याद्वारे आपण अभिरुचीसंपन्न समाज घडवू शकतो. मराठी भाषिक कलाकारांमधून असे आदर्श निर्माण झाले पाहिजेत, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे