शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 22:30 IST

सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले.

पुणे : सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. आज देखील देशाची हीच अवस्था असून, आगामी निवडणुकीत देशातील सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन देशाला चांगला पर्याय उपलब्ध करू देऊ, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन व पश्चिम  महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल येथे आयोजित केली होता.  यावेळी पवार बोलत होते. सभेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, चित्रा वाघ,  हसन मुश्रिफ , दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, फौजिया खान, आण्णा डांगे, जयदेव गायकवाड, वंदना चव्हाण, जालिंदर कामठे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘ देशात शेतकरी, व्यापारी, कामगार, सरकारी कर्मचारी कोणीच सुखी नाही. भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्याचा तर विक्रम झाला. नोटाबंदीचा निर्णय किती फसवा असल्याचे नेपाळमध्ये  आजही भारतीय जुन्या नोटा बदलून मिळातात यावरून स्पष्ट होते. त्यामुळे सत्तेवर येताना दिलेली सर्व आश्वासने फसवी असल्याचे आता जनतेच्या लक्षात आले आहे. छगन भुजबळ असो की देशाचे माजी अर्थंमंत्री पी. चिदंबरम यांना आत टाकण्याचे राजकारण भाजप करत आहे.  पुणे शहरातील एल्गार परिषदेच्या लोकांना नक्षलवादी ठरवणे असो की कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे. भाजप सरकारला लोकांचा पाठिंबा राहिलेला नाही.  त्यामुळेच देशातील सर्वच राज्यातील विरोधी पक्षाचे लोक भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची मानसिकता तयार झाली असून, हीच मानसिकता भाजपचा पराभव करू शकते. ’’

देशातील जनतेचा ईव्हीएम मशिनवर विश्वास राहिला नाही. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर मशिनबाबत तक्रार केली जाते असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. परंतु भंडारा-गोंदिया निवडणुकीत आमचा विजय होऊन देखील येथे मतदान यंत्रातील झालेल्या गोंधळाबाबत आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यापुढे ईव्हीएम मशिन नकोच अशी भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. देशात, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत परिर्वतन करण्याची गरज असून, यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा देखील पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले,  ‘‘आता पर्यंत गाव तेथे राष्ट्रवादी ही संकल्पना होती. पण आपल्या समोरील आवाहन मोठे आहे , त्यामुळे या पुढे ‘बुथ तेथे राष्ट्रवादी’ काम करण्याची गरज आहे. बुथ कमिटीच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहजण्याचे नियोजन केले.’ अजित पवार म्हणाले, ‘‘कोणीही सत्तेच्या गुर्मीत राहू नये, आज सत्तेत असलो तरी उद्या विरोधात बसू शकतात़  समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर झालाय. शेतकरी संपावर, शिक्षक संपावर, एसटी कामगार संपावर, सरकारी कर्मचारी संपावर, राज्यातील राज्यकर्ते करताय तरी का असा सवाल उपस्थित केला. यावेळी प्रफुल पटेल, सुनिल तटकरे,जयदेव गायकवाड, फौजीया खान आदी भाषण केले. आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत वंदना चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळSupriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेBhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018