शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 22:30 IST

सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले.

पुणे : सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. आज देखील देशाची हीच अवस्था असून, आगामी निवडणुकीत देशातील सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन देशाला चांगला पर्याय उपलब्ध करू देऊ, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन व पश्चिम  महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल येथे आयोजित केली होता.  यावेळी पवार बोलत होते. सभेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, चित्रा वाघ,  हसन मुश्रिफ , दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, फौजिया खान, आण्णा डांगे, जयदेव गायकवाड, वंदना चव्हाण, जालिंदर कामठे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘ देशात शेतकरी, व्यापारी, कामगार, सरकारी कर्मचारी कोणीच सुखी नाही. भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्याचा तर विक्रम झाला. नोटाबंदीचा निर्णय किती फसवा असल्याचे नेपाळमध्ये  आजही भारतीय जुन्या नोटा बदलून मिळातात यावरून स्पष्ट होते. त्यामुळे सत्तेवर येताना दिलेली सर्व आश्वासने फसवी असल्याचे आता जनतेच्या लक्षात आले आहे. छगन भुजबळ असो की देशाचे माजी अर्थंमंत्री पी. चिदंबरम यांना आत टाकण्याचे राजकारण भाजप करत आहे.  पुणे शहरातील एल्गार परिषदेच्या लोकांना नक्षलवादी ठरवणे असो की कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे. भाजप सरकारला लोकांचा पाठिंबा राहिलेला नाही.  त्यामुळेच देशातील सर्वच राज्यातील विरोधी पक्षाचे लोक भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची मानसिकता तयार झाली असून, हीच मानसिकता भाजपचा पराभव करू शकते. ’’

देशातील जनतेचा ईव्हीएम मशिनवर विश्वास राहिला नाही. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर मशिनबाबत तक्रार केली जाते असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. परंतु भंडारा-गोंदिया निवडणुकीत आमचा विजय होऊन देखील येथे मतदान यंत्रातील झालेल्या गोंधळाबाबत आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यापुढे ईव्हीएम मशिन नकोच अशी भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. देशात, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत परिर्वतन करण्याची गरज असून, यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा देखील पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले,  ‘‘आता पर्यंत गाव तेथे राष्ट्रवादी ही संकल्पना होती. पण आपल्या समोरील आवाहन मोठे आहे , त्यामुळे या पुढे ‘बुथ तेथे राष्ट्रवादी’ काम करण्याची गरज आहे. बुथ कमिटीच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहजण्याचे नियोजन केले.’ अजित पवार म्हणाले, ‘‘कोणीही सत्तेच्या गुर्मीत राहू नये, आज सत्तेत असलो तरी उद्या विरोधात बसू शकतात़  समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर झालाय. शेतकरी संपावर, शिक्षक संपावर, एसटी कामगार संपावर, सरकारी कर्मचारी संपावर, राज्यातील राज्यकर्ते करताय तरी का असा सवाल उपस्थित केला. यावेळी प्रफुल पटेल, सुनिल तटकरे,जयदेव गायकवाड, फौजीया खान आदी भाषण केले. आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत वंदना चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळSupriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेBhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018