शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 22:30 IST

सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले.

पुणे : सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. आज देखील देशाची हीच अवस्था असून, आगामी निवडणुकीत देशातील सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन देशाला चांगला पर्याय उपलब्ध करू देऊ, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन व पश्चिम  महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल येथे आयोजित केली होता.  यावेळी पवार बोलत होते. सभेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, चित्रा वाघ,  हसन मुश्रिफ , दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, फौजिया खान, आण्णा डांगे, जयदेव गायकवाड, वंदना चव्हाण, जालिंदर कामठे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘ देशात शेतकरी, व्यापारी, कामगार, सरकारी कर्मचारी कोणीच सुखी नाही. भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्याचा तर विक्रम झाला. नोटाबंदीचा निर्णय किती फसवा असल्याचे नेपाळमध्ये  आजही भारतीय जुन्या नोटा बदलून मिळातात यावरून स्पष्ट होते. त्यामुळे सत्तेवर येताना दिलेली सर्व आश्वासने फसवी असल्याचे आता जनतेच्या लक्षात आले आहे. छगन भुजबळ असो की देशाचे माजी अर्थंमंत्री पी. चिदंबरम यांना आत टाकण्याचे राजकारण भाजप करत आहे.  पुणे शहरातील एल्गार परिषदेच्या लोकांना नक्षलवादी ठरवणे असो की कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे. भाजप सरकारला लोकांचा पाठिंबा राहिलेला नाही.  त्यामुळेच देशातील सर्वच राज्यातील विरोधी पक्षाचे लोक भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची मानसिकता तयार झाली असून, हीच मानसिकता भाजपचा पराभव करू शकते. ’’

देशातील जनतेचा ईव्हीएम मशिनवर विश्वास राहिला नाही. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर मशिनबाबत तक्रार केली जाते असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. परंतु भंडारा-गोंदिया निवडणुकीत आमचा विजय होऊन देखील येथे मतदान यंत्रातील झालेल्या गोंधळाबाबत आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यापुढे ईव्हीएम मशिन नकोच अशी भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. देशात, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत परिर्वतन करण्याची गरज असून, यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा देखील पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले,  ‘‘आता पर्यंत गाव तेथे राष्ट्रवादी ही संकल्पना होती. पण आपल्या समोरील आवाहन मोठे आहे , त्यामुळे या पुढे ‘बुथ तेथे राष्ट्रवादी’ काम करण्याची गरज आहे. बुथ कमिटीच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहजण्याचे नियोजन केले.’ अजित पवार म्हणाले, ‘‘कोणीही सत्तेच्या गुर्मीत राहू नये, आज सत्तेत असलो तरी उद्या विरोधात बसू शकतात़  समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर झालाय. शेतकरी संपावर, शिक्षक संपावर, एसटी कामगार संपावर, सरकारी कर्मचारी संपावर, राज्यातील राज्यकर्ते करताय तरी का असा सवाल उपस्थित केला. यावेळी प्रफुल पटेल, सुनिल तटकरे,जयदेव गायकवाड, फौजीया खान आदी भाषण केले. आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत वंदना चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळSupriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेBhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018