शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबाने संपवले जीवन; भीमा नदीपात्रातून सात मृतदेह काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 21:00 IST

त्या तीन चिमुकल्यांचा काय दोष?....

केडगाव (पुणे) : आपल्या मुलाने नात्यागोत्यातील विवाहित मुलगी पळवून आणल्याने कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने निघोज (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील मोहन पवार व जावई श्याम फुलवरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तब्बल सातजणांनी पारगाव (ता.दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गेल्या सात दिवसांपासून नदीपात्रात रोज एक मृतदेह आढळून येत होते. मंगळवारी तीन चिमुकल्यांचे मृतदेह मिळून आल्याने हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले.

मूळचे बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील असणारी ही कुटुंबे भटकंती व्यवसाय करत असल्याने सध्या निघोज, ता. पारनेर येथे राहत होती. भीमा नदीमध्ये गेल्या सहा दिवसात सात मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज तीन चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले व शोधमोहीम यंत्रणेला पूर्णविराम मिळाला.

हृदय पिळवटून टाकणारी घटना पारगाव, तालुका दौंड येथे १७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार मयत मोहन उत्तम पवार (४५, रा. मूळ गाव खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांचा मुलगा अमोल याने नात्यातील एक विवाहित मुलगी पळवून आणली होती. ही गोष्ट मोहन पवार व त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. त्यामुळे मोहन पवार यांनी आपला दुसरा मुलगा राहुल पवार (रा. पुणे) याला फोनवरून याबाबत कल्पना दिली व अमोलने संबंधित विवाहित मुलगी परत तिच्या घरी नेऊन सोडावी याबाबत आग्रह धरला, तसे न केल्यास आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. परंतु अमोल आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने वडिलांचे म्हणणे ऐकलेच नाही यामुळे मोहन पवार व त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यामुळे या घटनेने निराश झालेल्या पवार यांच्यासह जावई फुलवरे यांच्या कुटुंबातील एकूण सातजणांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. मृतांमध्ये मोहन पवार यांची पत्नी संगीता मोहन पवार (४०), मोहन पवार यांची मुलगी राणी श्याम फुलवरे (२४, मूळ गाव हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद), जावई श्याम पंडित फुलवरे (२८) व नातू रितेश श्याम फुलवरे (७), छोटू श्याम फुलवरे (५), कृष्णा श्याम फुलवरे (३) यांचा समावेश आहे.

पारगाव (ता. दौंड) येथील मच्छीमार भानुदास शिंदे यांना सर्वप्रथम एक मृतदेह तरंगत असल्याची बातमी समजली. त्यांनी तात्काळ सरपंच जयश्री ताकवणे यांच्यामार्फत यवत पोलिसांशी संपर्क साधला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या बचाव पथकाने दोन दिवसांत सर्व मृतदेह बाहेर काढले. सर्वांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या अंगावरती कसल्याही खुणा आढळल्या नाहीत त्यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्या तीन चिमुकल्यांचा काय दोष?

या सर्व प्रकरणामध्ये आत्महत्या करणाऱ्यांपैकी तिघेजण अल्पवयीन चिमुकले आहेत. या तीन चिमुकल्यांना किंबहुना आत्महत्या करायची याची कल्पनाही नसावी. खरे तर या वयामध्ये शिक्षण घेणे अपेक्षित होते; परंतु भटकंतीचा व्यवसाय असल्याने शिक्षण घेता आले नाही. अज्ञानामुळे किंवा अशिक्षितपणामुळे कुटुंबीयांनी आपल्यासोबत या तिघांचा बळी घेतला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज भीमा नदी काठावर पवार व फुलवरे कुटुंबातील तिघे सदस्य उपस्थित होते .त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस