शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

''दादां''नी राजकीय संन्यास घेतल्यास शरद पवारांचा राजकीय वारस कोण..? राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 14:00 IST

खासदार सुप्रिया सुळे , रोहित पवार, पार्थ पवार..की अजून कुणी..?

ठळक मुद्देलोकसभा लढविणाऱ्या मुलाला ''दादां'' चा शेती करण्याचा सल्ला दादांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत सन्नाटा.. 

बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.मात्र, यावर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारराजकारण सोडुन शेती करण्याच्या विचारात आहेत,त्यांनी मुलांनाही शेती करण्याचा सल्ला दिला आहे,अशी माहिती  दिली.मात्र, पुत्र पार्थ पवार यांना खासदार करण्यासाठी जीवाचे रान करणारे अजित पवार हा सल्ला कसा देवु शकतात,याबाबत राजकीय पटलावर विविध चर्चांना उधाण आले आहे.तसेच दादांनी खरोखर राजकीय संन्यास घेतल्यास साहेबांचा राजकीय वारस कोण ,हा प्रश्न नव्याने चर्चेत आला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या मेगा गळतीनंतर साहेबांच्या झंझावाती महाराष्ट्र दौऱ्यानंतर पक्ष आता कुठे सावरायला सुरुवात झाली होती.. त्यात कालच्या ईडीच्या नाट्यमय प्रकरणात शरद पवारांनी घेतलेला पवित्रा राष्ट्रवादीसाठी 'मास्टरस्ट्रोक' ठरावा इतपत यशस्वी झाला.. पण त्याचा आनंद साजरा करत असतानाच राजकीय आणि राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप घडविणारी बातमी आली.. अन् काही क्षणार्धात सर्वत्र राजकीय क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले.साहेबांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पण अजित पवारांच्या राजीनामा अस्रावर अजित पवारांनी आपल्याशी कुठलाही संपर्क केला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राजकारणाची खालावत चाललेली पातळीकडे कारण देत दादा राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.. यानंतर चर्चा सुरु झाली ती दादांनंतर साहेबांचा राजकीय वारस कोण.. ? खासदार सुप्रिया सुळे , रोहित पवार, पार्थ पवार की धनंजय मुंडे वा अजून कुणी...? 

 मावळ लोकसभेचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्यानंतर पार्थला विजय मिळवा, या साठी माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीत संपुर्ण राजकीय ताकत पणाला लावली. मावळ मतदारसंघातील त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यापासुन मतदानापर्यंत अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले. राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीलाच पुत्र पार्थ यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी,यासाठी अजित पवार यांनीच मोठी ताकत लावली होती. गेल्या दहा वर्षांपासून 'मावळ'वर शिवसेनेचे वर्चस्व ठेवण्यात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यशस्वी ठरले आहेत. हे माहिती असुन देखील पार्थ यांच्या विजयासाठी प्रबळ उमेदवार असणाऱ्या  खासदार बारणे यांना दादांनी जोरदार फाईट देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेत असल्याचे जाहीर करत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पार्थ यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीसह पवार कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या ' साहेबां 'चा देखील पाठिंबा होता.या मतदारसंघातून मुलगा पार्थ याला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी स्वत: कंबर कसली  होती.मात्र,त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर पार्थ यांच्याबाबत राजकीय चर्चा थांबल्या.परंतु, पार्थ पवार यांनी नुकताच १६ सप्टेंबर रोजी बारामती शहरात बेरोजगारांसाठी मोठा मेळावा घेतला होता.यावेळी मेळाव्याला पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार,भाऊ जय पवार  देखील उपस्थित होते. या मेळाव्यामुळे पार्थ पुन्हा राजकीय रिंगणात उतरणार असल्याचे मानले जात होते.मात्र,पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ' साहेबां'च्या माहितीनुसार अजितदादांनी गलिच्छ राजकारणामुळे त्यांच्या मुलांना शेती करण्याचा सल्ला दिला आहे.याबाबत अजितदादांच्या कुटुंबाकडुन माहिती मिळाल्याचे देखील यावेळी साहेबांनी स्पष्ट केले.त्यामुळे पुत्र पार्थ यांना खासदार करण्याचा चंग बांधलेल्या दादांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलाला शेती करण्याचा सल्ला का दिला,यामागे मोठे राजकीय की कौटुंबिक गुढ आहे,याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. त्यासाठी खुद्द अजित पवार यांच्याकडूनच राजीनाम्याचे कारण जाणून घ्यावे लागणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणparth pawarपार्थ पवार