शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

''दादां''नी राजकीय संन्यास घेतल्यास शरद पवारांचा राजकीय वारस कोण..? राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 14:00 IST

खासदार सुप्रिया सुळे , रोहित पवार, पार्थ पवार..की अजून कुणी..?

ठळक मुद्देलोकसभा लढविणाऱ्या मुलाला ''दादां'' चा शेती करण्याचा सल्ला दादांच्या राजीनाम्यानंतर बारामतीत सन्नाटा.. 

बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.मात्र, यावर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारराजकारण सोडुन शेती करण्याच्या विचारात आहेत,त्यांनी मुलांनाही शेती करण्याचा सल्ला दिला आहे,अशी माहिती  दिली.मात्र, पुत्र पार्थ पवार यांना खासदार करण्यासाठी जीवाचे रान करणारे अजित पवार हा सल्ला कसा देवु शकतात,याबाबत राजकीय पटलावर विविध चर्चांना उधाण आले आहे.तसेच दादांनी खरोखर राजकीय संन्यास घेतल्यास साहेबांचा राजकीय वारस कोण ,हा प्रश्न नव्याने चर्चेत आला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या मेगा गळतीनंतर साहेबांच्या झंझावाती महाराष्ट्र दौऱ्यानंतर पक्ष आता कुठे सावरायला सुरुवात झाली होती.. त्यात कालच्या ईडीच्या नाट्यमय प्रकरणात शरद पवारांनी घेतलेला पवित्रा राष्ट्रवादीसाठी 'मास्टरस्ट्रोक' ठरावा इतपत यशस्वी झाला.. पण त्याचा आनंद साजरा करत असतानाच राजकीय आणि राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप घडविणारी बातमी आली.. अन् काही क्षणार्धात सर्वत्र राजकीय क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले.साहेबांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पण अजित पवारांच्या राजीनामा अस्रावर अजित पवारांनी आपल्याशी कुठलाही संपर्क केला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राजकारणाची खालावत चाललेली पातळीकडे कारण देत दादा राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.. यानंतर चर्चा सुरु झाली ती दादांनंतर साहेबांचा राजकीय वारस कोण.. ? खासदार सुप्रिया सुळे , रोहित पवार, पार्थ पवार की धनंजय मुंडे वा अजून कुणी...? 

 मावळ लोकसभेचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्यानंतर पार्थला विजय मिळवा, या साठी माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीत संपुर्ण राजकीय ताकत पणाला लावली. मावळ मतदारसंघातील त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यापासुन मतदानापर्यंत अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले. राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीलाच पुत्र पार्थ यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी,यासाठी अजित पवार यांनीच मोठी ताकत लावली होती. गेल्या दहा वर्षांपासून 'मावळ'वर शिवसेनेचे वर्चस्व ठेवण्यात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यशस्वी ठरले आहेत. हे माहिती असुन देखील पार्थ यांच्या विजयासाठी प्रबळ उमेदवार असणाऱ्या  खासदार बारणे यांना दादांनी जोरदार फाईट देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेत असल्याचे जाहीर करत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पार्थ यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीसह पवार कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या ' साहेबां 'चा देखील पाठिंबा होता.या मतदारसंघातून मुलगा पार्थ याला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी स्वत: कंबर कसली  होती.मात्र,त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर पार्थ यांच्याबाबत राजकीय चर्चा थांबल्या.परंतु, पार्थ पवार यांनी नुकताच १६ सप्टेंबर रोजी बारामती शहरात बेरोजगारांसाठी मोठा मेळावा घेतला होता.यावेळी मेळाव्याला पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार,भाऊ जय पवार  देखील उपस्थित होते. या मेळाव्यामुळे पार्थ पुन्हा राजकीय रिंगणात उतरणार असल्याचे मानले जात होते.मात्र,पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ' साहेबां'च्या माहितीनुसार अजितदादांनी गलिच्छ राजकारणामुळे त्यांच्या मुलांना शेती करण्याचा सल्ला दिला आहे.याबाबत अजितदादांच्या कुटुंबाकडुन माहिती मिळाल्याचे देखील यावेळी साहेबांनी स्पष्ट केले.त्यामुळे पुत्र पार्थ यांना खासदार करण्याचा चंग बांधलेल्या दादांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलाला शेती करण्याचा सल्ला का दिला,यामागे मोठे राजकीय की कौटुंबिक गुढ आहे,याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. त्यासाठी खुद्द अजित पवार यांच्याकडूनच राजीनाम्याचे कारण जाणून घ्यावे लागणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणparth pawarपार्थ पवार