शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या रेल्वे गाड्यांचे डबे कधी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:32 IST

- डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना धक्के खात करावा लागतो प्रवास

पुणे : पुणे-मुंबईदरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे; परंतु सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथील प्लॅटफॉर्म नंबर १० आणि ११ चे विस्तारीकरण करण्यात आले. यामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या गाड्यांचे डबे वाढविण्यात येणार होते; परंतु काम पूर्ण होऊनही डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय मात्र अजून झाला नाही. त्यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.

पुणे-मुंबईदरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने चाकरमानी ये-जा करतात; परंतु सध्या या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख गाड्यांना १६ डबे आहेत. तुलनेत प्रवासी संख्या मात्र जास्त आहे. त्यामुळे जागा अपुरी पडत आहे. परिणामी वादाचे प्रसंग घडत आहेत. या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या २४ करणे गरजेचे आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मुंबईतील फलाटांचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यामुळे या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला; परंतु त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. त्यामुळे प्रवाशांना आहे त्या गाड्यांमध्ये धक्के खात प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

वादावादीचे प्रसंग टाळतील...

सकाळच्या सत्रात नोकरी व कामानिमित्त दैनंदिन ये-जा करणारे प्रवासी पास काढून प्रवास करतात. त्यामुळे त्यांची जागा राखीव असते; परंतु या डब्यांमध्ये एकादा नवीन प्रवासी बसला आणि पासधारक आले तर जागेवरून उठावे लागते. अशा वेळी वादावादी होतात. काही वेळा सिंहगड एक्स्प्रेसमध्ये हाणामारीदेखील झाली आहे. रेल्वेला कायम गर्दी असते. त्यामुळे वादावादीचे प्रसंग टाळायचे असतील, तर प्रशासनाला रेल्वे गाड्यांचे डबे वाढविणे गरजेचे आहे.

रेल्वे प्रशासन म्हणते...सध्या पुण्यातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल डबे वाढविण्यात येत आहेत. झेलम एक्स्प्रेस व इतर दोन-तीन प्रमुख गाड्यांचे डबे बदलून वाढविण्यात आले आहे, तसेच एलएचबी कोच लावण्यात येत आहे. पुढील काही महिन्यांत पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे डबेदेखील क्रमशः वाढविण्यात येतील.

एसटी आणि ट्रॅव्हल्सचे तिकीट दर जास्त आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रमुख गाड्यांचे डबे १६ वरून २४ करावेत, अशी आमची मागणी आहे; परंतु रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. - हर्षा शहा

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी