शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

माळशेज घाट रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 14:23 IST

मार्गावर २६ रेल्वे स्थानक प्रस्तावित

ठळक मुद्देसर्वेक्षणाचे काम झाले पूर्ण; कामे मात्र रखडलेलीमार्गाचे तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू हा मार्ग कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट,  ओतूर ते नगर असा जाणार

राजुरी : नगर, ठाणे, पुण्याच्या ग्रामीण भागासाठी वरदान ठरणाऱ्या आणि तब्बल २२ वर्षांपेक्षाही अधिक काळ रखडलेल्या माळशेज रेल्वे मार्गाचे प्राथमिक आणि तांत्रिक सर्वेक्षणाचे काम कल्याण ते नगरपर्यंत पूर्ण झाले आहे. या मार्गावर २६ रेल्वे स्थानके  प्रस्तावित असून या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला कधी महूर्त मिळणार, या प्रतीक्षेत तिन्ही जिल्ह्यांतील नागरिक आहेत.  घाटाचा विकास व्हावा तसेच जलद वाहतूकीसाठी हा रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. कल्याण ते नगर पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्णही झाले. ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती  वर्षांपूर्वी उघडकीस आणली होती. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण एक वर्षाआधीच पूर्ण करण्यात आले आहे. हा मार्ग कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट,  ओतूर ते नगर असा जाणार आहे. या मार्गावर कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ कांभा रोड, आपटी, पाटगाव, मुरबाड, राव, डाहेरी मिल्हे, नागतार केबिन, वारीवघर केबिन, देवरूखवाडी, केबिन, मढ, जुन्नर रोड, ओतूर, पदरवाडी, मालवाडी, कोटडावाडी, शिंदेवाडी, वासुंदे, धोत्रे, भाळवणी, हमीदपूर आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहे.    हा रेल्वे मार्ग पूर्णत: फायद्यात असल्याचे सांगण्यात येत असून या तांत्रिक सर्वेक्षणाचाचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल तयार करण्यात आल्यानंतरच तो रेल्वे बोर्डापुढे  मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्याला मान्यता मिळण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्यामुळे हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माळशेज पट्टा व ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार हे नक्की.......मार्ग विशाखापट्टणमपर्यंत जोडता येणारनगर -औरंगाबादमार्गे पुढे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो. त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे, पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असे वाटते आहे. तसेच हा मार्ग होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तसेच जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुढाकार घेऊन  हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी होत आहे..........

तब्बल २२ वर्षांपासून काम रखडले सर्वेक्षणाचे कल्याण ते नगर काम पूर्ण पूर्णत: फायद्याचा मार्ग असल्याचा दावा माळशेज पट्ट्याच्या विकासाला तारक जुन्नरच्या पर्यटन विकासाला फायदा ठाणे, नगर, पुणे या तीन जिल्ह्यांना उपयुक्त  .......माळशेज रेल्वे धावू लागल्यास ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांना दूरची बाजारपेठ नजीक उपलब्ध होणार आहे. 2यामुळे त्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय मिळणार आहे. शिवाय पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रात जुन्नर तालुक्यात माळशेज रेल्वे क्रांती निर्माण करेल असा तज्ज्ञांकडून अंदाज वर्तविला जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे