शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

माळशेज घाट रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 14:23 IST

मार्गावर २६ रेल्वे स्थानक प्रस्तावित

ठळक मुद्देसर्वेक्षणाचे काम झाले पूर्ण; कामे मात्र रखडलेलीमार्गाचे तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू हा मार्ग कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट,  ओतूर ते नगर असा जाणार

राजुरी : नगर, ठाणे, पुण्याच्या ग्रामीण भागासाठी वरदान ठरणाऱ्या आणि तब्बल २२ वर्षांपेक्षाही अधिक काळ रखडलेल्या माळशेज रेल्वे मार्गाचे प्राथमिक आणि तांत्रिक सर्वेक्षणाचे काम कल्याण ते नगरपर्यंत पूर्ण झाले आहे. या मार्गावर २६ रेल्वे स्थानके  प्रस्तावित असून या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला कधी महूर्त मिळणार, या प्रतीक्षेत तिन्ही जिल्ह्यांतील नागरिक आहेत.  घाटाचा विकास व्हावा तसेच जलद वाहतूकीसाठी हा रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. कल्याण ते नगर पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्णही झाले. ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती  वर्षांपूर्वी उघडकीस आणली होती. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण एक वर्षाआधीच पूर्ण करण्यात आले आहे. हा मार्ग कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट,  ओतूर ते नगर असा जाणार आहे. या मार्गावर कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ कांभा रोड, आपटी, पाटगाव, मुरबाड, राव, डाहेरी मिल्हे, नागतार केबिन, वारीवघर केबिन, देवरूखवाडी, केबिन, मढ, जुन्नर रोड, ओतूर, पदरवाडी, मालवाडी, कोटडावाडी, शिंदेवाडी, वासुंदे, धोत्रे, भाळवणी, हमीदपूर आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहे.    हा रेल्वे मार्ग पूर्णत: फायद्यात असल्याचे सांगण्यात येत असून या तांत्रिक सर्वेक्षणाचाचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल तयार करण्यात आल्यानंतरच तो रेल्वे बोर्डापुढे  मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्याला मान्यता मिळण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्यामुळे हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माळशेज पट्टा व ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार हे नक्की.......मार्ग विशाखापट्टणमपर्यंत जोडता येणारनगर -औरंगाबादमार्गे पुढे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो. त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे, पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असे वाटते आहे. तसेच हा मार्ग होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तसेच जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुढाकार घेऊन  हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी होत आहे..........

तब्बल २२ वर्षांपासून काम रखडले सर्वेक्षणाचे कल्याण ते नगर काम पूर्ण पूर्णत: फायद्याचा मार्ग असल्याचा दावा माळशेज पट्ट्याच्या विकासाला तारक जुन्नरच्या पर्यटन विकासाला फायदा ठाणे, नगर, पुणे या तीन जिल्ह्यांना उपयुक्त  .......माळशेज रेल्वे धावू लागल्यास ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांना दूरची बाजारपेठ नजीक उपलब्ध होणार आहे. 2यामुळे त्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय मिळणार आहे. शिवाय पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रात जुन्नर तालुक्यात माळशेज रेल्वे क्रांती निर्माण करेल असा तज्ज्ञांकडून अंदाज वर्तविला जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे