शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमके काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 06:32 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांकडून शासनस्तरावर प्रयत्न सुुरू आहेत. मुळात, अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमके काय, असा प्रश्न मला पडतो.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांकडून शासनस्तरावर प्रयत्न सुुरू आहेत. मुळात, अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमके काय, असा प्रश्न मला पडतो. अभिजाततेच्या दर्जाबाबत आजवर कोणीही स्पष्टीकरण दिलेले नाही. मराठीला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तरीही, मराठीच्या वापराची सर्व स्तरांवर अंमलबजावणी केली जात नाही. त्यासाठी आग्रहही धरला जात नाही, हे विशेष! असे परखड मत माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकमत प्रतिनिधीने साधलेला संवाद.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी साहित्य संस्थांकडून शासनस्तरावर प्रयत्न सुुरू आहेत. मुळात, अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमके काय, असा प्रश्न मला पडतो. अभिजाततेच्या दर्जाबाबत आजवर कोणीही स्पष्टीकरण दिलेले नाही. राज्यघटनेतील १४ भाषांमध्ये मराठी भाषेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मराठीला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तरीही, मराठीच्या वापराची सर्व स्तरांवर अंमलबजावणी केली जात नाही. त्यासाठी आग्रहही धरला जात नाही, हे विशेष! मराठीच्या प्रश्नासाठीजंतरमंतरवर आंदोलने करून काही साध्य होणार नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे एका समितीची स्थापना करून त्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा झाला पाहिजे. शासनस्तरावरील अधिकाºयांनी शासकीय कामकाज मराठी भाषेमध्ये करावे, यासाठी सक्ती करणे गरजेचे आहे. महामंडळाने साहित्यिक व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीने देशाच्या सर्व प्रांतांमध्ये संलग्न शाखांचा विस्तार करायला हवा. नव्या साहित्य संस्था स्थापन करणे, साहित्यविषयक चर्चा घडवून आणणे अशा प्रयत्नांनी मराठी भाषेची उपयुक्तता वाढवता येऊ शकते.साहित्यिक हा समाजाचाच एक घटक असतो. आजूबाजूला घडणाºया राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांचे प्रतिबिंब त्याच्या लेखनातून उमटणे, सामाजिक घडामोडींबाबत त्याने अभिव्यक्त होणे आवश्यक असते. घटना, घडामोडींचे त्याच्या मनावर पडसाद उमटतात, त्यातून मिळणाºया अंत:प्रेरणेतून लेखक उत्स्फूर्तपणे लिहिता होतो. हे लेखन ठरवून लिहिता येत नाही, ते आपोआप कागदावर उतरते. त्याच्या साहित्यावर सरकारकडून, समाजाकडून दबाव आणला जातो, हे अर्धसत्य आहे. आजही आपला ९० टक्के समाज सहिष्णू, समंजस आणि सहनशील आहे. विशिष्ट विचारसरणीच्या ५ ते १० टक्के गटाकडून साहित्याच्या विरोधात गोंधळ घातला जातो, हिंसक वळण दिले जाते. या मोजक्या लोकांमुळे संपूर्ण समाजावर असहिष्णुतेचा शिक्का मारणे चुकीचे आहे. मी सध्या ‘पांढºयावरती काळे’ या पुस्तकातून साहित्य, समाजविषयक लेखांचे संकलन करत आहे. याशिवाय, सामाजिक सहिष्णुतेवर आधारित ‘शुद्धिपत्र’ या कादंबरीचे लेखन सुरू आहे. यामध्ये एका शब्दकोशकाराचा संघर्ष शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे.अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढत आहे. शासनाकडून मिळणाºया अनुदानापोटी राजकीय व्यक्तींना आवर्जून आमंत्रित केले जाते. राजकीय व्यक्ती हाही वाचक साहित्यप्रेमी असतो. त्यामुळे साहित्य संमेलनामध्ये त्यांना सामावून घेण्याबाबत दुमत नाही; मात्र साहित्याच्या पंढरीत राजकीय वरचष्मा असू नये, असे मला वाटते. प्रत्यक्षात, साहित्य संमेलनांसाठी सरकारदरबारी अनुदानावर अवलंबून राहता कामा नये. पूर्वी साहित्य संमेलनाला भेट देणाºयांची संख्या मर्यादित होती. आजकाल हजारोंच्या संख्येने रसिक संमेलनाला हजेरी लावतात. अशा वेळी, वाढत्या खर्चाचे गणित साधण्यासाठी शासनाऐवजी उद्योजकांची मदत घ्यायला हरकत नाही.साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण हे तत्कालीन वाङमयीन, भाषिक प्रश्नांचे प्रतिबिंब असते. अध्यक्षाने त्या वेळच्या वाङमयीन समस्येवर भाषणातून भाष्य केले पाहिजे. एक तासाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सर्व विषयांवर बोलणे शक्य नसते. सर्व विषयांना अंगोपांगाने विचार करायचा म्हटल्यास कोणत्याही एका विषयाला न्याय देता येत नाही. मी संमेलनाध्यक्ष असताना ‘मराठीवर होणारा अन्याय’ हा विषय अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता.