शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भूमिपूजनाला गेलो, नारळ फोडला अन् म्हणालो, कारखाना होणार नाही; शरद पवारांनी सांगितली 'ती' आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 15:57 IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार पवार यांनी तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली.

राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून आमदार रोहित पवार यांनी राज्यातील दौरे वाढवले आहेत. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार पवार यांनी तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या सुरुवातील आज खासदार शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कचा किस्साही सांगितला.

प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा,असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा पक्ष नेतृत्वाला थेट इशारा

खासदार शरद पवार म्हणाले, माझा एक छोटासा अनुभव सांगतो. पुण्यापासून २१ किलोमीटरवर एक साखर कारखाना होणार होता. त्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला मला बोलावलं. तो कारखाना काढणारे गृहस्थ आमचे मित्र होते त्यांचं नाव नाना नवले ते कारखान्याचे चेअरमन होते. एकेकाळी महाराष्ट्र नाही तर देशाच्या सर्व विद्यापीठांमध्ये कुस्तीमध्ये एक नंबरचा पारितोषिक त्यांनी मिळवलेले. त्यांनी सहकारी कारखाना काढण्याचं ठरवलं. मला बोलावलं मी गेलो तिथे नारळ फोडला, कुदळ मारली, भाषणाला उभा राहिलो आणि सांगितलं की, इथे कारखाना होणार नाही.

"लोक बोलले अरे भूमीपूजनाला बोलावलं आणि सांगतात कारखाना होणार नाही, म्हटलं नाही होणार. तुम्हाला मी २० मैलावर जागा देतो तिथे कारखाना करा. मग इथे काय करायचं ? म्हटलं इथे मला आयटीचं केंद्र करायचंय, तिथे आयटीचं केंद्र काढलं, तुम्ही आज तिथे जाऊन बघा. आज त्या ठिकाणी एक प्रकारचा चमत्कार झालेला आहे, असंही शरद पवार म्हणाले.

"त्यावेळेला जमीन पाहिजे होती आयटी सेंटर काढायचं किंवा कुठलाही उद्योग काढायचा तर जमीन लागते. तर आता जमीन कुठून आणायची ? मला आठवलं की, आमच्या बरोबरचाच आमचा एक सहकारी होता, तो एमआयडीसीचा प्रमुख आहे. त्याचं नाव श्रीनिवास पाटील त्यांना सांगितलं आणि आठ दिवसांच्या आत काही हजार एकर जमीन एक्वायर करून ताब्यात दिली, म्हटलं करा काम सुरू. तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला. हे उदाहरण यासाठी मी देतोय की, आज अशा प्रकारच्या उद्योगांची उभारणी करणं ही महाराष्ट्राची गरज आहे. त्यासाठी संघर्ष यात्रा आग्रह धरत असेल तर माझ्या मते सरकारला यावर निर्णय घ्यायला भाग पाडावेच लागेल, असंही पवार म्हणाले.

मी काही खोलात जाऊ इच्छित नाही , पण तुम्ही ज्या मागण्या केल्यात मग त्या कंत्राटी नोकर भरती असो, अवाजवी परीक्षा शुल्क असो, शाळा दत्तक योजना असो, समूह शाळा योजना असून, नोकर भरतीचा भ्रष्टाचार थांबवणं असो या सगळ्या निर्णयांबद्दल सरकारशी बोलावं लागेल. हवं असेल तर रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांना मी एक माहिती देऊ इच्छीतो की, तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्या मागण्या तुम्ही एकत्रित करा व मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. तुमची इच्छा असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की, या तरुणांच्या मागण्यांसाठी बैठक बोलवा मी स्वतः त्या बैठकीला तुमच्याबरोबर हजर राहतो. त्यांना या मागण्यांची सनद आपण त्यांना देऊ आणि किती दिवसांत कोणता निर्णय तुम्ही घेता ? या संबंधीची स्वच्छ विचारणा त्यांना करू, त्यांनी काम आपलं केलं तर अभिनंदन करू नाही केलं तर काय करायचं ते ठरवू, असा सल्लाही शरद पवारांनी दिला.

"माझी खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री तुम्हा लोकांच्या प्रश्नांबद्दल गांभीर्याने बघतील आणि या प्रश्नांची सोडवणूक करतील एवढेच या ठिकाणी सांगतो. रोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जो कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे हा सबंध रस्त्याने जात असताना तिथल्या तरुणांच्या आत्मविश्वास तुम्ही वाढवाल आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलायला आज नवीन पिढी रस्त्यावर उतरलेली आहे हे दाखवाल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवार