शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 22:07 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला इशारा.

लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती : "बीड जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेची न्यायालय आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेमागील ‘मास्टरमाइंड’चा शोध घेतला जाईल. कोणीही असू द्या, त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, मुख्यमंत्र्यांसह आम्ही तिघांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथील घटनेबाबत इशारा दिला.

बारामतीकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सलग आठव्यांदा निवडून आल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शारदा प्रांगण येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, "शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.देशमुख यांना अमानुषपणे मारण्यात आल्याचे त्यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्या अमानुष लोकांना फाशी झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी फास्टट्रॅक खटला चालविण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्यांना सोडणार नाही. परभणी येथील घटनेबाबत देखील सरकाने लक्ष घातले आहे. ते कुटुंब उघड्यावर पडू दिले जाणार नाही," असे पवार म्हणाले.

बारामतीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांबाबत अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाचा तरुण पिढीकडून होणारा वापर चिंताजनक आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलामुलींकडे लक्ष द्यावे. मुलांबरोबर संवाद साधावा. आपली नवीन पिढी चुकीच्या रस्त्याने जाता कामा नये, असे पवार म्हणाले.यावेळी खासदार सुनेत्रा पवार,पार्थ पवार,आमदार अमोल मिटकरी,पक्ष निरीक्षक सुरेश पालवे,निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,जय पाटील,राजवर्धन शिंदे ,केशवराव जगताप,संभाजी होळकर आदी उपस्थित होते. बारामतीत काम करणाऱ्या अधिकार्यांनी माझ्या गतीने काम करण्याची तयारी ठेवावी. अन्यथा जमत नसल्यास बदली करुन दुसऱ्या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवावी. काम करा,अन्यथा त्यांना बदलून जाण्याची मुभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. "बारामती आता देशात क्रमांक एकचे शहर बनविणार"

"यंदा बारामतीकरांनी ऐतिहासिक करिश्मा घडवून आणला. बारामतीच्या माझ्या आमदारकीच्या ७ ‘टर्म’ पाहिल्या. त्या एकूण काळात झालेल्या विकासापेक्षा अधिक विकास यंदा आठव्या ‘टर्म’मध्ये करुन बारामतीचा पूर्ण कायापालट करणार आहे. बारामतीशी इमान राखत राज्यात काम करताना जीवाचे रान करू, राज्यात क्रमांक एकचे शहर अशी ओळख असणारी बारामती आता देशात क्रमांक एकचे शहर बनवण्यासाठी नियोजन करणार, बारामतीचा जिरायती शब्द कायमचा पुसणार," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत १ लाखांपेक्षा मिळालेल्या मताधिक्क्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांचे कौतुक केले. दरम्यान, राज्यातील घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील मिरवणूक आपण रद्द केली. राज्यात अशा घटना घडलेल्या असताना आपण हारतुरे घेणे बरोबर नसल्याने मिरवणूक रद्द केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbaramati-acबारामतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण