शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

...त्या ठिकाणी स्वतंत्र लढू आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:28 IST

ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत

पुणे : आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येवू, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १२० दिवसात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही. निवडणुक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात पाऊस जास्त असेल त्या भागातील निवडणुका थोड्या पुढे ढकलण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला करू. पण वेळेत निवडणुका पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.

महापालिकांच्या निवडणूका स्वबळावर लढणार की महायुतीच्या माध्यमातून, या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्हाला महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिन्ही पक्ष एकच आहोत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ते पाच पाच, सात सात वर्ष काम करतात, त्यांना निवडणूक लढवावी, असे वाटणे सहाजिकच आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येवू. अपवादात्मक ठिकाणी जेथे स्वतंत्र निवडणूक लढू, तेथे एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू. मात्र, जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

शासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यशाळा

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आम्ही प्रशासकीय सुधार, ई गव्हर्रनचा वापर आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासठी संवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध गट तयार करून एका एका गटासोबत मी चर्चा करत आहे. त्यांच्या अडचणी काय आहेत. आमच्या अपेक्षा काय आहेत, यावर नवीन काय करता येईल, याचा एकत्रीत विचार करत आहोत. यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रमाचा दिला आहे. अनेक लोक चांगले काम करत आहेत. ते जोपर्यंत पदावर असतात, तोवर ते काम राहते, ते बदलल्यानंतर व नवीन कोणी आल्यावर त्यात बदल होते. असे न होण्यासाठी संस्थात्मक बांधणी करायची आहे, त्यासाठी या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. यानंतरही कार्यशाळा होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीBJPभाजपा