शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत महाराष्ट्राला १ नंबरवर आणले; उदय सामंत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 10:17 IST

Uday Samant- महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमका किती जणांना रोजगार दिला गेला, हा आत्मचिंतनाचा विषय

पुणे: आयटी धोरण अंमलबजावणी केल्याने आयटी क्षेत्रातही नवीन गुंतवणूक वाढलेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमका किती जणांना रोजगार दिला गेला, हा आत्मचिंतनाचा विषय आहे. मात्र, आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकून महाराष्ट्राला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आणले असल्याचे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकही कॅबिनेट सबकमिटी झाली नव्हती. मात्र, आता एका वर्षात तीन वेळा सबकमिटी बैठक झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांशी संबंधित गुंतवणुकीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत. मागील बैठकीत ४५ हजार कोटींच्या, तर कालच्या बैठकीत ३९ हजार ९०० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मुंबईतील झवेरी बाजार हा नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात येत असून, त्या ठिकाणी २१ एकरची जागा त्यांना देण्यात आली आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक या ठिकाणी होणारा असून १ लाख रोजगार निर्मिती आगामी काळात होईल.

दावोसमध्ये एक कोटी ३७ लाख रुपयांचे करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले आणि त्यापैकी ८६ हजार कोटींच्या प्रकल्पांना राज्यात जमीन दिली गेली आहे. तसेच आतापर्यंत एसटी महामंडळाने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत १० लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या माध्यमातून वर्षभरात मोफत प्रवास केला आहे. तर १४ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीने प्रवास करण्याचा फायदा घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष