शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही, सगळीकडे साथ हवी - अजित पवार

By राजू हिंगे | Updated: March 27, 2024 20:19 IST

शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे

पुणे : मी काय फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे. काही लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. फोन करती पण त्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका. महाराष्ट्र केसरीतील वाद मिटवावा असं मला वाटतंय. खेळात वाद नको असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीराचा स्नेह मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर, बाबा कंधारे, पंकज हरकुडे, अप्पा रेणुसे, दत्ता सागरे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांतून पहिलवान आले आहेत. त्या सर्वांचे मी स्वागत करतो. तुमची शिरुर, पुणे, बारामती, मावळ यासह ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असणार आहेत त्या सर्वांना सहकार्य करा, तुम्ही आशीर्वाद द्या,आम्ही तुम्हाला निश्चित सहकार्य केले जाईल. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जसा कोल्हापूरच्या तालीम संघाचा विकास आराखडा आहे. तसा आराखडा तयार करण्यात येईल. पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात कुलगुलगुरूंची नेमणूक केलेली आहे असे पवार यांनी सांगितले.

देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक

लोकांनी अनेकदा आम्हाला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे . ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. काही लोकं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रीडा क्षेत्रासाठी मी काम केलं आहे,कुठलीही अडचण येऊ दिली नाही. महायुतीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. महाराष्ट्रचा सर्वांगिक विकास कसा होईल हे बघतोय असेही अजित पवार यांनी सांगितले.

देशाची राज्यघटना बदलतील असं काहीही होणार नाही

लोकशाहीत कुणी कुणाचं काम करायचं. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण देश आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. मात्र काही लोकं गैरसमज पसरवत आहेत. जर 2024 मध्ये मोदी सरकार आलं तर ते देशाची राज्यघटना बदलतील असं काहीही म्हटलं जातंय. पण तसं काहीही होणार नाही असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपा