शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीन द्यायचीच नाही; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:12 IST

- प्रांताधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ : उपोषणादरम्यान पारगावचे सरपंच ज्योती मेमाणे अत्यवस्थ, ग्रामीण रुग्णालयात दाखल

सासवड : आम्ही उपोषण करतोय हा आमचा गुन्हा आहे का? सरकार आमची दखल घेत नाही, फक्त पुणे, मुंबईतून विमानतळाच्या घोषणा होत आहेत. हे असले राजकीय विचाराचे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे विमानतळ आम्हाला नको आहे. तुमचे पैसे आम्हास नकोत, आम्हाला आमची जमीन प्यारी आहे. ज्यांना विमानतळ प्रकल्प करायचा आहे त्यांनी स्वतःच्या जागेत करावा, नाही तर आम्हाला तुमची जागा द्या आणि नंतर विमानतळ करा, तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणालाही आम्ही पाय ठेवून देणार नाही. असा एल्गार करीत विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध जाहीर केला. जोपर्यंत विमानतळ रद्द केल्याची अधिसूचना निघत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, असा निर्धार केला. त्यामुळे प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

विमानतळ आम्हाला नकोच, अशी घोषणा सात गावातील शेतकऱ्यांनी सासवडमधील प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थतीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. उपोषण सुरू असताना शुक्रवारी तहसीलदार विक्रम राजपूत यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आमच्या भावना जोपर्यंत शासनापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच शासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर रविवारी (दि. ६) पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

मात्र, उपस्थित सर्वच शेतकरी आक्रमक होऊन आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जमीन द्यायची नाही, ज्यांना विमानतळ प्रकल्प करायचा आहे, त्यांनी स्वतःच्या जागेत करावा, नाही तर आम्हाला तुमची जागा द्या आणि नंतर विमानतळ करा, तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणालाही पाय ठेवून देणार नाही, अशा प्रकारचा एल्गार करीत विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध जाहीर केला. प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या, तसेच तुमच्या मागण्या लेखी स्वरूपात द्याव्यात, त्या जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने पाठविण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर उपस्थित सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आपल्या हरकती आणि मागण्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्याकडे लेखी स्वरूपात सुपुर्द केल्या.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावांत विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावे औद्योगिक क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केली, तसेच भूसंपादनाचा पुढील टप्पा गाठण्याच्या दृष्टीने गावोगावी अधिकारी शेतकऱ्यांशी संवादाच्या माध्यमातून ड्रोन सर्व्हे करण्याच्या प्रयत्नात आहे, तसेच ३२ ‘ग’चा आदेश निघाल्यानंतर सातबारावरती शिक्के मारण्याची प्रक्रिया होणार आहे. 

विमानतळ प्रकल्पबाधितांच्या मागण्या -

- विमानतळ प्रकल्पबाधित गावांचा करण्यात येणारा ड्रोन सर्व्हे तातडीने थांबवावा.

- विमानतळ प्रकल्पामुळे गावातील सर्व फळबागा नष्ट होणार असून, त्यावरील जीवन उद्ध्वस्त होईल.

- प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन आणि बेघर होतील. यासह विविध मागण्या दिल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळPurandarपुरंदर