शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीन द्यायचीच नाही; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:12 IST

- प्रांताधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ : उपोषणादरम्यान पारगावचे सरपंच ज्योती मेमाणे अत्यवस्थ, ग्रामीण रुग्णालयात दाखल

सासवड : आम्ही उपोषण करतोय हा आमचा गुन्हा आहे का? सरकार आमची दखल घेत नाही, फक्त पुणे, मुंबईतून विमानतळाच्या घोषणा होत आहेत. हे असले राजकीय विचाराचे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे विमानतळ आम्हाला नको आहे. तुमचे पैसे आम्हास नकोत, आम्हाला आमची जमीन प्यारी आहे. ज्यांना विमानतळ प्रकल्प करायचा आहे त्यांनी स्वतःच्या जागेत करावा, नाही तर आम्हाला तुमची जागा द्या आणि नंतर विमानतळ करा, तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणालाही आम्ही पाय ठेवून देणार नाही. असा एल्गार करीत विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध जाहीर केला. जोपर्यंत विमानतळ रद्द केल्याची अधिसूचना निघत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, असा निर्धार केला. त्यामुळे प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

विमानतळ आम्हाला नकोच, अशी घोषणा सात गावातील शेतकऱ्यांनी सासवडमधील प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थतीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. उपोषण सुरू असताना शुक्रवारी तहसीलदार विक्रम राजपूत यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आमच्या भावना जोपर्यंत शासनापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच शासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर रविवारी (दि. ६) पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

मात्र, उपस्थित सर्वच शेतकरी आक्रमक होऊन आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जमीन द्यायची नाही, ज्यांना विमानतळ प्रकल्प करायचा आहे, त्यांनी स्वतःच्या जागेत करावा, नाही तर आम्हाला तुमची जागा द्या आणि नंतर विमानतळ करा, तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणालाही पाय ठेवून देणार नाही, अशा प्रकारचा एल्गार करीत विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध जाहीर केला. प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या, तसेच तुमच्या मागण्या लेखी स्वरूपात द्याव्यात, त्या जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने पाठविण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर उपस्थित सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आपल्या हरकती आणि मागण्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्याकडे लेखी स्वरूपात सुपुर्द केल्या.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावांत विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावे औद्योगिक क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केली, तसेच भूसंपादनाचा पुढील टप्पा गाठण्याच्या दृष्टीने गावोगावी अधिकारी शेतकऱ्यांशी संवादाच्या माध्यमातून ड्रोन सर्व्हे करण्याच्या प्रयत्नात आहे, तसेच ३२ ‘ग’चा आदेश निघाल्यानंतर सातबारावरती शिक्के मारण्याची प्रक्रिया होणार आहे. 

विमानतळ प्रकल्पबाधितांच्या मागण्या -

- विमानतळ प्रकल्पबाधित गावांचा करण्यात येणारा ड्रोन सर्व्हे तातडीने थांबवावा.

- विमानतळ प्रकल्पामुळे गावातील सर्व फळबागा नष्ट होणार असून, त्यावरील जीवन उद्ध्वस्त होईल.

- प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन आणि बेघर होतील. यासह विविध मागण्या दिल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळPurandarपुरंदर