शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

तुमची याचिका वाचण्याचे आदेश आम्ही राहुल गांधी यांना देऊ शकत नाही! उच्च न्यायालयाने मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:25 IST

विरोधकांचा एकच उद्देश आहे की, राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवून ठेवायचे आहे, खोट्या केसेस दाखल करायच्या आहेत - वकील

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतचा द्वेष दूर करण्यासाठी काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आमची जनहित याचिका एकदा वाचण्याचे निर्देश द्यावेत, अशा आशयाची उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत निकाली काढली. तुमची ही याचिका वाचण्याचे आदेश आम्ही राहुल गांधी यांना देऊ शकत नाही, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली.

काय आहे याचिका?

राहुल गांधी हे संवैधानिक पदावर आहेत. भविष्यात ते देशाचे पंतप्रधानही होऊ शकतात. त्यामुळे भारताच्या स्वातंत्रलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सावरकरांबाबत चुकीची आणि बेजबाबदार विधाने करत ते तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा डॉ. पंकज फडणीस यांनी जनहित याचिकेतून केला. तसेच, राहुल गांधी यांनी आमची जनहित याचिका एकदा वाचावी व तसे निर्देश राहुल गांधी यांना देण्याची मुख्य मागणी प्रा. डॉ. पंकज फडणीस यांनी केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यासंदर्भात योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते डॉ. पंकज फडणीस यांना दिला.

दरम्यान, याप्रकरणी डॉ. पंकज फडणीस यांनी काही काळापूर्वी सर्वोच्च न्यायालयातही याचिका सादर केली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे आपल्यासह अनेकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येतेय, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. मात्र, ही याचिका देखील सुनावणीस योग्य नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. तो सुनावणीसाठी प्रलंबित आहे. २९ जुलैपासून त्या खटल्याची नियमित सुनावणी होणार असून, त्यामुळे याप्रकरणी पुन्हा नवी सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे याचिका निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक खोटे दावे, खटले, याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. विरोधकांचा एकच उद्देश आहे की, राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवून ठेवायचे आहे. खोट्या केसेस दाखल करायच्या, परंतु आता पुण्यातील बदनामीचा खटला सुनावणीसाठी आहे. त्यामुळे अशा याचिका दाखल करणे म्हणजे कायद्याचा व न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेतल्यासारखे आहे. - ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार, राहुल गांधी यांचे पुण्यातील वकील.

टॅग्स :PuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालय