शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

तुमची याचिका वाचण्याचे आदेश आम्ही राहुल गांधी यांना देऊ शकत नाही! उच्च न्यायालयाने मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:25 IST

विरोधकांचा एकच उद्देश आहे की, राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवून ठेवायचे आहे, खोट्या केसेस दाखल करायच्या आहेत - वकील

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतचा द्वेष दूर करण्यासाठी काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आमची जनहित याचिका एकदा वाचण्याचे निर्देश द्यावेत, अशा आशयाची उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत निकाली काढली. तुमची ही याचिका वाचण्याचे आदेश आम्ही राहुल गांधी यांना देऊ शकत नाही, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली.

काय आहे याचिका?

राहुल गांधी हे संवैधानिक पदावर आहेत. भविष्यात ते देशाचे पंतप्रधानही होऊ शकतात. त्यामुळे भारताच्या स्वातंत्रलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सावरकरांबाबत चुकीची आणि बेजबाबदार विधाने करत ते तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा डॉ. पंकज फडणीस यांनी जनहित याचिकेतून केला. तसेच, राहुल गांधी यांनी आमची जनहित याचिका एकदा वाचावी व तसे निर्देश राहुल गांधी यांना देण्याची मुख्य मागणी प्रा. डॉ. पंकज फडणीस यांनी केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यासंदर्भात योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते डॉ. पंकज फडणीस यांना दिला.

दरम्यान, याप्रकरणी डॉ. पंकज फडणीस यांनी काही काळापूर्वी सर्वोच्च न्यायालयातही याचिका सादर केली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे आपल्यासह अनेकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येतेय, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. मात्र, ही याचिका देखील सुनावणीस योग्य नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. तो सुनावणीसाठी प्रलंबित आहे. २९ जुलैपासून त्या खटल्याची नियमित सुनावणी होणार असून, त्यामुळे याप्रकरणी पुन्हा नवी सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे याचिका निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक खोटे दावे, खटले, याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. विरोधकांचा एकच उद्देश आहे की, राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवून ठेवायचे आहे. खोट्या केसेस दाखल करायच्या, परंतु आता पुण्यातील बदनामीचा खटला सुनावणीसाठी आहे. त्यामुळे अशा याचिका दाखल करणे म्हणजे कायद्याचा व न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेतल्यासारखे आहे. - ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार, राहुल गांधी यांचे पुण्यातील वकील.

टॅग्स :PuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालय