शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारचा पराभव करा, स्वामी अग्निवेश यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 2:14 PM

संसदीय राजकारणातून या सरकारचा पराभव करा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी केले.

पुणे : सरकार, त्यांची धोरणे यावर टिका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही घाबरविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही. याविरोधात संविधान मानणाऱ्या सर्वांनी एकत्र आले पाहिजे. संसदीय राजकारणातून या सरकारचा पराभव करा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व भारतीय संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आयोजित "धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी" राज्यस्तरीय संकल्प परिषदेला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यावेळी बोलत होते. यासाठी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सचिव मिलिंद देशमुख, माधव बागवे उपस्थित होते.

स्वामी अग्निवेश यांच्यावर यापूर्वी झालेले हल्ले लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वामी अग्निवेश म्हणाले, सत्तेत बसलेली शक्ती 'वसुधैव कुटुंबकम' च्या विरोधात काम करीत आहे. त्यांच्या विरोधात घंटी वाजली आहे. सर्व मनुष्य हा एकाच परिवाराचा भाग आहे.

जो धर्म माणसाला माणसाचा दर्जा देऊ शकत नाही, त्याला धर्म म्हणता येणार नाही. कुणाच्या अंगावर कोट्यवधी रूपयांचा कोट दिसतो तर गरिबांच्या अंगावर घालण्यासाठी सूत नाही. हा कोट कुणाच्या अंगावर होता, ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही असे अग्निवेश यांनी स्पष्ट केले. अंधश्रद्धेची गुलामी सर्वात घातक आहे, त्यामुळे त्यविरोधातील लढाई सर्वात महत्त्वाची असल्याचे अग्निवेश यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे