शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

बारामती तालुक्यातील १३ गावांत टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:57 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळातून शेतकरी पूर्णत: होरपळला आहे.

हिवाळा संपायच्या आताच बारामती तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात दुष्काळाची तीव्रता केवळ शेतीपर्यंत नव्हे, तर पिण्याच्या पाण्यापर्यंत प्रचंड जाणवणार आहे. तीव्र दुष्काळामुळे तालुक्यातील केवळ ४१.१८ टक्के रब्बी पेरण्या झाल्या होत्या. यामध्ये बहुतांश ठिकाणी ती संपूर्ण लागवड जळाल्याने महसूल प्रशासनाने तालुक्यातील ६५ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. तालुक्यात सध्या केवळ बारामती मंडळ, वडगाव निंबाळकर मंडळ कार्यक्षेत्रात चारा उपलब्धता आहे. याशिवाय माळेगाव, सुपा, मोरगाव, लोणी, उंडवडी मंडळ कार्यक्षेत्रात सध्या भीषण चाराटंचाई आहे. या ठिकाणी चाºयाची गरज असल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाºयांना पाठविला आहे.

पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या आक डेवारीनुसार तालुुक्यात ६६ गावांमध्ये तीव्र चाराटंचाई आहे. तालुक्यात एकूण ६० हजार ९० लहान-मोठी जनावरे आहेत. तर ८५ हजार ६४७ शेळ्या-मेंढ्या आहेत. मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो चारा, लहान जनावरांना ७ किलो प्रतिदिन चाºयाची गरज भासते. या हिशोबानुसार जवळपास ७८२.५१३ मेट्रिक टन चाºयाची जनावरांना गरज आहे. जनावरांसाठी २० लाख ४३ हजार ३१० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाला या गरजांची पूर्तता करण्याचे आव्हान पेलावेच लागणार आहे.जिरायती भागातील ८० टक्के शेतकरी दूध व्यवसाय करतात. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय जिरायती भागात मात्र शेतकºयांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे. जनावरांसाठी चारा महागला आहे. गेल्या अनेक वर्षांत पाणी आणि चाराटंचाईचे चटके शेतकरी अनुभवत आहेत. सध्या साखर कारखाने सुरू असल्याने उसाचे वाढे जनावरांच्या चाºयासाठी शेतकरी विकत आणत आहेत. त्यातच वाढ्याचे दरदेखील दीडपटीने वाढलेले आहेत. हा चारादेखील साखर कारखान्यांचा गळीत हंगामाबरोबरच संपुष्टात येणार आहे. चारशे रुपये प्रतिशेकडा दराने विकले जाणारे वाढे शेतकरी ६०० रुपये शेकडा दराने नाईलाजाने विकत घेत आहेत. शेतात काही पिकलेच नसल्याने जनावरांना चारा विकत घ्यावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जनावरे जगविण्यासाठी सर्वसामान्य शेतकºयांना चारा विकत घेण्याची गेल्या तीन महिन्यांपासून वेळ आली आहे. उसामध्ये अन्नद्रव्याची असलेली कमतरता व केवळ जनावरांचे पोट भरण्यासाठी होत असलेला वापर यामुळे दुग्ध उत्पादनात घट होऊ लागली आहे. परिमाणी दुष्काळी स्थितीत उपजीविकेचा आधार असणाºया दुग्ध व्यवसायावर चाराटंचाईचे संकट घोंगावत आहे. जिरायती भागात तातडीने चारा डेपो सुरू करण्याची मागणी होत आहे.शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. रोहयोअंतर्गत तरुणांना रोजगार उपलब्ध करावा, शेतीपंपाच्या वीजबिलात ३३.५० टक्के सूट द्यावी, शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती द्यावी,जमीन महसुलात सूट देण्याची मागणी येथील राजकीय पक्षांच्या वतीने देखील करण्यात आली आहे.

नाझरे धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. या धरणातून बारामती तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या नाझरेमध्ये केवळ एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. त्यानंतर या गावात दुष्काळाचे चटके आणखी तीव्र होणार आहेत. जानाई शिरसाईच्या पाणी तलावात सोडण्याच्या मागणीसाठी बारामती तालुक्यातील उंडवडी क.प. येथील शेतकºयांना पाच दिवस आमरण उपोषण केले.पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून पाणी सोडण्याचे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी लेखी पत्राद्वारे दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे. शेतकºयांना जानाई शिरसाईच्या पाण्याची मोठी गरज आहे. तालुक्याच्या जिरायती भागात ठिकठिकाणी चारा छावण्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, या मागण्यांचे मुख्यमंत्र्यांकडे बारामतीच्या सामाजिक संघटनांनी साकडे घातले आहे.बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळातून शेतकरी पूर्णत: होरपळला आहे. खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकºयांच्या हाती कोणतेही पीक लागले नाही. परिणाम तालुक्यातील शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुष्काळातील शेतकºयांना दूधधंद्याचाच आधार उरला आहे. मात्र,जनावरांसाठी चाºयाचा तुटवडा जाणवू लागला आहे. १३ गावे, १५१ वाड्यावस्त्यांवरील ३५ हजार ३८६ लोकसंख्येला १७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी ७ गावांसाठी टँकर प्रस्तावित आहेत. जिरायती भागात यंदा १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळ जाणवत आहे. नाले, तलाव, ओढे, विहिरी कोरडे पडले आहेत.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे