शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वेला नळचोरांचा झटका; नळ बसविण्याचा खर्च सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:18 IST

रेल्वेने चांगल्या सुविधा देऊनही काही प्रवाशांकडूनच त्याला ठेंगा दाखविला जात असल्याचे समोर आले आहे..

ठळक मुद्देदोन गाड्यांमधील तब्बल ३ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरीला डब्ब्यांमधील स्वच्छतेसह दिवे, पंखे, एसी, स्वच्छतागृहातील देखभाल याकडे प्राधान्याने लक्ष

पुणे : रेल्वेमध्ये चांगल्या सुविधा सुविधा मिळत नसल्याची ओरड अनेक प्रवासी करतात. बंद पंखे, एसी, दिवे यांसह खराब आसने, ब्लँकेट, अस्वच्छता अशा विविध कारणांसाठी रेल्वेच्या कामकाजावर बोट ठेवले जाते. पण रेल्वेने चांगल्या सुविधा देऊनही काही प्रवाशांकडूनच त्याला ठेंगा दाखविला जात असल्याचे समोर आले आहे. पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस व मुंबई-गडग एक्सप्रेस या दोन गाड्यांमधील तब्बल ३ लाख रुपये किंमतीचे ब्रँडेड नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. हे नळ बसविण्याची मजुरी व इतर खर्च धरल्यास हा आकडा सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत जात असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या नळचोर प्रवाशांमुळे रेल्वे प्रशासनही गोंधळून गेले आहे.प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. डब्ब्यांमधील स्वच्छतेसह दिवे, पंखे, एसी, स्वच्छतागृहातील देखभाल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तत्परतेने अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अनेक गाड्यांचे रुपडेही पालटले जात आहे. मध्य रेल्वेकडून काही महिन्यांपूर्वीच डेक्कन एक्सप्रेसला नवी झळाळी दिली. गाडीमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा दिल्या आहेत. त्यामध्ये स्वच्छतागृहात ब्रँडेड कंपन्यांचे नळ व इतर साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यापासून आतापर्यंत जवळपास १०० हून अधिक नळ व इतर साहित्य प्रवाशांनी चोरले आहे. असाच प्रकार मुंबई-गडग (कर्नाटक) एक्सप्रेसमध्येही घडला आहे. या गाडीला ७० वस्तु चोरीला गेल्या आहेत. रेल्वेच्या उत्कृष्ट प्रकल्पाअंतर्गत मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा दिल्या जात आहेत. डब्यांमधील सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत. त्यानुसार मुंबई विभागाकडून गडग व डेक्कन एक्सप्रेसचा चेहरा मोहरा बदलला आहे. प्रत्येक डब्यासाठी सुमारे ६० लाखांचा खर्च केला आहे. प्रवाशांना गरजा ओळखून हे बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. पण काही प्रवाशांकडून नळासह विविध साहित्याची चोरी होत असल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच झटका बसत आहे. शेवटच्या थांब्यावर गाडी रिकामी झाल्यानंतर चोरीचे प्रकार घडत असावेत, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ................डेक्कन एक्सप्रेसमधील डब्ब्यांच्या स्वच्छतागृहात प्रसिध्द ब्रॅण्डचे २४० नळ व इतर साहित्य बसविले होते. त्यापैकी ९९ नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. तर गडग एक्सप्रेस १६० पैकी ७० नळ व इतर साहित्य चोरीला गेले आहे. यामधील एक नळ व इतर साहित्याची किंमत प्रत्येकी १४०० ते २८०० एवढी आहे. त्यामुळे चोरीमुळे तब्बल ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेThiefचोर