शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कालवा दुरूस्तीपर्यंत पाणी पुरवठा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 19:59 IST

दांडेकर पुलाजवळील कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तसेच लाखो लिटर पाणी वाया गेले.

ठळक मुद्देलष्कर,पर्वती भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे दोन दिवसांचा कालावधीकालव्यात पाणी नसल्यामुळे तब्बल ३५० मिलियन लिटर पाण्याचा तुटवडा भासणार

पुणे : खडकवासला कालव्यातून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाणी उचलून शहरातील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कालवाच फुटल्याने जलशुध्दीकरण केंद्रात पाणी घेता येणे शक्य नाही. त्यामुळे कालव्याची दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत शहरातील काही भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून बंद पाईपलाईनमधून पर्वती जलशुध्दीकरण केंद्रात पाणी घेतले जाते. तसेच काही पाणी कालव्यातून उचलले जाते. त्यानंतर लष्कर व पर्वती भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दांडेकर पुलाजवळील कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. तसेच लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी गुरूवारी साडेअकराच्या सुमारास बंद करण्यात आले. कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत कालव्यात पाणी सोडले जाणार नाही. परिणामी शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तर काही भागात दोन दिवस पाणीच येवू शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.कालवा फुटल्यामुळे लष्कर भागातील होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ, येरवडा, कोरेगावपार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदननगर, नगररस्ता, विमाननगर आदी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. पर्वती व वडगाव जलकेंद्रच्या कार्यकारी अभियंत्याकडून प्राप्त झालेल्या माहिनीनुसार पर्वती जलशुध्दीकरण केंद्रात कालव्यामधून लष्कर भागासाठी दररोज २५० मिलियन लिटर आणि पर्वती भागासाठी दररोज १०० मिलियन लिटर पाणी घेतले जाते. कालव्यात पाणी नसल्यामुळे तब्बल ३५० मिलियन लिटर पाण्याचा तुटवडा भासणार आहे. परिणामी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.   

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी