शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

जलसुरक्षकाचा प्रस्ताव हरवला सरकारी निर्णयाच्या दुष्काळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 01:41 IST

जलस्थितीचा अचूक अंदाजच समजेना

- विशाल शिर्के पुणे : दुष्काळी स्थितीचा अंदाज येण्यासाठी भूजलाची अचूक माहिती आणि पर्जन्याच्या नोंदी घेण्यासाठी राज्यात पुरेशी यंत्रणाच नसल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात ३३ हजार ठिकाणी यासाठी निरिक्षण विहिरी घेण्यासाठी जलसुरक्षक नेमण्याचा प्रस्ताव सरकारी निर्णयाच्या दुष्काळात हरविला आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून राज्य सरकारला या योजनेच्या मसूद्यास मान्यता द्यावी असे स्मरणपत्र पाठवूनही त्यावर गेल्या वर्षभरात कार्यवाही झालेली नाही. देशासह राज्यात पाच वर्षांतील एक वर्षे दुष्काळाचे, एक कमी पावसाचे आणि एक वर्षे बऱ्या पावसाचे जाते. त्यामुळे उपलब्ध पावसाचा योग्य वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे निरीक्षण केले जाते. हा आकडा ३३ हजारांवर वाढविण्यात येणार आहे. या नोंदी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्व्हरला थेट पाठविण्यात येतील. या नोंदी घेण्यासाठी ग्रामपंचायतीत असणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचाºयाची नियुक्ती करावी. त्यास जलसुरक्षक असे संबोधावे असा मसुदा भूजल विभागाने राज्य सरकारला दिला आहे. या मसूद्यावर कोणताही निर्णय न झाल्याने यंदाच्या मॉन्सूनमध्ये भूजल पातळीबरोबरच पर्जन्यमान देखील नोंदविता आले नाही. राज्यात सरासरीच्या ८४ टक्के इतका पाऊस झाला आहे. मराठवाडा, नागूर, अमरावती व नाशिक विभागातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. पाण्याच्या नियोजनासाठी, दुष्काळी भागात योजना राबविणसाठी या भूजल नोंदी म्हत्त्वाच्या ठरणार आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहायाने राबविण्यात येणाºया जलस्वराज्य कार्यक्रमांतर्गत पर्जन्यमान व भूजल नोंदीचा कार्यक्रम राज्यसरकारने हाती घेतला आहे.जलसुरक्षक नेमणे, त्याचे प्रशिक्षण आणि मानधनाबाबत सविस्तर मसूदा तयार करुन राज्य सरकारला दिला आहे. हा मसूदा मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे.- शेखर गायकवाड, संचालक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई