शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

जलसुरक्षकाचा प्रस्ताव हरवला सरकारी निर्णयाच्या दुष्काळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 01:41 IST

जलस्थितीचा अचूक अंदाजच समजेना

- विशाल शिर्के पुणे : दुष्काळी स्थितीचा अंदाज येण्यासाठी भूजलाची अचूक माहिती आणि पर्जन्याच्या नोंदी घेण्यासाठी राज्यात पुरेशी यंत्रणाच नसल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात ३३ हजार ठिकाणी यासाठी निरिक्षण विहिरी घेण्यासाठी जलसुरक्षक नेमण्याचा प्रस्ताव सरकारी निर्णयाच्या दुष्काळात हरविला आहे.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून राज्य सरकारला या योजनेच्या मसूद्यास मान्यता द्यावी असे स्मरणपत्र पाठवूनही त्यावर गेल्या वर्षभरात कार्यवाही झालेली नाही. देशासह राज्यात पाच वर्षांतील एक वर्षे दुष्काळाचे, एक कमी पावसाचे आणि एक वर्षे बऱ्या पावसाचे जाते. त्यामुळे उपलब्ध पावसाचा योग्य वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे निरीक्षण केले जाते. हा आकडा ३३ हजारांवर वाढविण्यात येणार आहे. या नोंदी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्व्हरला थेट पाठविण्यात येतील. या नोंदी घेण्यासाठी ग्रामपंचायतीत असणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचाºयाची नियुक्ती करावी. त्यास जलसुरक्षक असे संबोधावे असा मसुदा भूजल विभागाने राज्य सरकारला दिला आहे. या मसूद्यावर कोणताही निर्णय न झाल्याने यंदाच्या मॉन्सूनमध्ये भूजल पातळीबरोबरच पर्जन्यमान देखील नोंदविता आले नाही. राज्यात सरासरीच्या ८४ टक्के इतका पाऊस झाला आहे. मराठवाडा, नागूर, अमरावती व नाशिक विभागातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. पाण्याच्या नियोजनासाठी, दुष्काळी भागात योजना राबविणसाठी या भूजल नोंदी म्हत्त्वाच्या ठरणार आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहायाने राबविण्यात येणाºया जलस्वराज्य कार्यक्रमांतर्गत पर्जन्यमान व भूजल नोंदीचा कार्यक्रम राज्यसरकारने हाती घेतला आहे.जलसुरक्षक नेमणे, त्याचे प्रशिक्षण आणि मानधनाबाबत सविस्तर मसूदा तयार करुन राज्य सरकारला दिला आहे. हा मसूदा मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे.- शेखर गायकवाड, संचालक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

टॅग्स :droughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई