शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

तिढा पाण्याचा : बारामती-माढाचे खासदार जलसंपदा विभागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 20:58 IST

नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो...

ठळक मुद्देसुप्रिया सुळे-रणजित निंबाळकर यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेटजलसंपदा विभागाने देखील २०१८ साली नवा करार करण्याबाबत राज्य सरकारला कळविले

पुणे : नीरा देवघर धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून बारामती-सोलापूरला दिल्या जाणाऱ्या पाणी कोट्याचे वादंग सुरु असतानाच बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोमवारी (दि.१०) जलसंपदाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र भेट घेतली. तसेच, नीरा कालव्यासह आपापल्या मतदारसंघातील पाणी पुरवठ्याच्या कामांचा आढावा घेतला. नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो. त्यातील जवळपास ६० टक्के पाणी बारामती परिसराला जाते. त्याचा करार २०१७ साली संपुष्टात आला. तसेच, जलसंपदा विभागाने देखील २०१८ साली नवा करार करण्याबाबत राज्य सरकारला कळविले आहे. माढाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बारामतीला अधिक पाणी जात असल्याचा दावा करत नवा करार करण्याची मागणी केली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.त्या पार्श्वभूमीवर खासदार निंबाळकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नीरा देवघर प्रकल्पामधून निरा डाव्या कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत चर्चा केली. नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला मिळणारे अतिरिक्त पाणी थांबविण्याची शिफारस महाराष्ट्र कृष्णा खोरे व विकास महामंडळाकडून राज्यशासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.निरा देवघर धरणातील पाणी हे निरा डाव्या कालव्यातून बेकायदेशीररित्या बारामती परिसराला दिले जात होते. त्यामुळे निरा डाव्या कालव्याच्या अंंतर्गत असलेले फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी पाणी मिळत होते. यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या गावांत सध्या सुरु असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि विद्यमान पाणी योजना, तलाव, धरणांतील उपलब्ध पाणी साठा आणि विंधन विहिरींचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांच्यासह पुरंदर, बारामती, मुळशी, भोर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.  मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी येथील तलावात पावसाळ्यामध्ये एका वेळेस पाणी सोडल्यास प्रामुख्याने मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेmadha-pcमाढाBaramatiबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेWaterपाणी