शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तिढा पाण्याचा : बारामती-माढाचे खासदार जलसंपदा विभागात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 20:58 IST

नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो...

ठळक मुद्देसुप्रिया सुळे-रणजित निंबाळकर यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेटजलसंपदा विभागाने देखील २०१८ साली नवा करार करण्याबाबत राज्य सरकारला कळविले

पुणे : नीरा देवघर धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातून बारामती-सोलापूरला दिल्या जाणाऱ्या पाणी कोट्याचे वादंग सुरु असतानाच बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही खासदारांनी सोमवारी (दि.१०) जलसंपदाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र भेट घेतली. तसेच, नीरा कालव्यासह आपापल्या मतदारसंघातील पाणी पुरवठ्याच्या कामांचा आढावा घेतला. नीरा डाव्या कालव्यातून बारामती परिसराला आणि उजव्या कालव्यातून सोलापूर भागाला पाणीपुरवठा होतो. त्यातील जवळपास ६० टक्के पाणी बारामती परिसराला जाते. त्याचा करार २०१७ साली संपुष्टात आला. तसेच, जलसंपदा विभागाने देखील २०१८ साली नवा करार करण्याबाबत राज्य सरकारला कळविले आहे. माढाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी बारामतीला अधिक पाणी जात असल्याचा दावा करत नवा करार करण्याची मागणी केली आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.त्या पार्श्वभूमीवर खासदार निंबाळकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर नीरा देवघर प्रकल्पामधून निरा डाव्या कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत चर्चा केली. नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला मिळणारे अतिरिक्त पाणी थांबविण्याची शिफारस महाराष्ट्र कृष्णा खोरे व विकास महामंडळाकडून राज्यशासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.निरा देवघर धरणातील पाणी हे निरा डाव्या कालव्यातून बेकायदेशीररित्या बारामती परिसराला दिले जात होते. त्यामुळे निरा डाव्या कालव्याच्या अंंतर्गत असलेले फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी पाणी मिळत होते. यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या गावांत सध्या सुरु असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि विद्यमान पाणी योजना, तलाव, धरणांतील उपलब्ध पाणी साठा आणि विंधन विहिरींचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांच्यासह पुरंदर, बारामती, मुळशी, भोर विधानसभा मतदार संघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.  मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी येथील तलावात पावसाळ्यामध्ये एका वेळेस पाणी सोडल्यास प्रामुख्याने मळद, कुरकुंभ, जिरेगाव, कौठडी या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेmadha-pcमाढाBaramatiबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेWaterपाणी