शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

बारामतीला मिळणारे पाणी फक्त पिण्यासाठीच- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 02:26 IST

बारामती तालुक्यातील तलावामध्ये तसेच पाणी योजनांसाठी खडकवासलामधून येणारे पाणी हे फक्त पिण्यासाठी असणार आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील तलावामध्ये तसेच पाणी योजनांसाठी खडकवासलामधून येणारे पाणी हे फक्त पिण्यासाठी असणार आहे. त्याचा शेतीसाठी कोणीही वापर करू नका. पाण्याचे दुर्भिक्ष भविष्यात जाणवणार आहे. हे नैसर्गिक संकट आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नका. सामंज्यस्याने, सहकार्याने दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.बारामती तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी पाणीटंचाई, चाराटंचाई, रोहयो अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाच्या आढावा बैठकीचे कविवर्य मोरोपंत सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पवार यांनी दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांच्या शासनस्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, या वर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने उपलब्ध पाण्याचे माणसांच्या व जनावरांच्या पिण्याकरिताच प्राधान्य असणार आहे. तालुक्याला पाणीपुरवठा होत असलेल्या जानाई, शिरसाई तसेच पुरंदर उपसा योजना इत्यादींचा आढावा घेण्यात आला. खासदार शरद पवार यांच्या खासदार निधीतून सिमेंट बंधारे बांधण्याकरिता एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यामध्ये आवश्यक तेथे टँकरने पाणीपुरवठा, चारा छावण्या, रोहयो अंतर्गत करावयाची कामे इत्यादीबाबत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून आवश्यक कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.दुष्काळाच्या काळामध्ये उपलब्ध होणाºया पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त पिण्याकरिताच करावयाचा असल्याचे सांगून इतर बाबींकरिता वापर होत असल्यास त्या विहिरींवरील विद्युतपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे सांगितले. मागील वर्षी नियोजन करण्यात आलेल्या ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरणाची कामे तसेच गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही सांगितले. रोजगार हमी योजनामार्फत करावयाच्या कामांकरिता पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे सांगून शासनाने जाहीर केलेल्या बारामती तालुक्यातील दुष्काळी गावातील १२ हजार विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास पासेस देण्यात आले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच नागरिकांनी उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या समस्यांचे उत्तरे देण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.>जानाई-शिरसाईसाठी पाणी मिळणार : हेमंत निकमजिरायती भागातील पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासलामधून जानाई योजनेसाठी १५० एमसीएफटी आणि शिरसाई योजनेसाठी १०० एमसीएफटी पाणी देण्यात येणार आहे. खडकवासलाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. या पाण्यातून शिरसाई योजनेवरील ६ तलाव तर जानाई योजनेवरील १३ तलाव भरण्यात येणार आहे. त्यापैखी जानाई योजनेसाठी तलावात ५० एमसीएफटी पाणी आले आहे. १५० एमसीएफटी पाणी तलावात आल्यानंतर हे पाणी सुपे तलावात सोडण्यात येणार आहे. तालुक्यात आतापर्यंत दहा टँकरमार्फत १३० वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत असून, नव्याने मागणी करण्यात आलेल्या गावांना जीपीएस प्रणाली लावून तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पाणीवाटपाचे माहे मे महिन्यापर्यंतचे ६० ते ६५ टँकरचे नियोजन केले आहे. दरम्यान, बारामती शहरामध्ये देखील भविष्यात येणाºया पाणी संकटावर आताच उपायोजना करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. नगरपालिकेने शहरात असणाºया जुन्या, इतिहासकालीन विहिरींची स्वच्छता करून घ्यावी. हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्यास त्याचा वापर करावा. तसेच काही विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्यास त्याचा वापर नगरपालिकेने केलेल्या वृक्षांसाठी करावा. पाणी कोठेही वाया जाणार नाही याची काळजी घ्या, असे सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार