शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा, नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे!

By श्रीकिशन काळे | Updated: April 2, 2024 14:25 IST

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रातातील कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि ते देखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रातातील कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाचा उन्हाळा तापदायक ठरणार असल्याचा अंदाज दिलेला आहे. सध्या मध्यप्रदेशपासून विदर्भ, कर्नाटक, दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात दिवसा उन्हाच्या झळा प्रचंड अहेत. रात्री देखील उष्णता वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याने दुचाकीचालक घामेघूम होत आहेत.

पुणे शहरातील किमान तापमानही चांगलेच वाढले आहे. शहरातील ३० पैकी २० हवामान अंदाज स्टेशनवर किमान तापामन हे २० अंशावर नोंदले गेले आहे. तर १० केंद्रांवर २० अंशाच्या खाली तापमान नोंदवले गेले. यावरून पुणे चांगलेच तापू लागले असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात वडगावशेरी येथे २६.४, मगरपट्टा २५.२, कोरेगाव पार्क २३.९, हडपसर २३.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगरला १८.९ अंश तापमान होते. 

रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. तर कमाल तापमान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारच्या वेळी महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नये. - अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानSocialसामाजिकHealthआरोग्यenvironmentपर्यावरण