शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

वाड्यांना विकासाची प्रतीक्षा, सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष, मालकासोबत भाडेकरूही वैैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:21 AM

१० हजारपेक्षा जास्त जुन्या वाड्यांचा विकास रखडला आहे. प्रशासन त्याबाबत काहीच हालचाल करायला तयार नाही व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचेही या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : शहरातील सुमारे १० हजारपेक्षा जास्त जुन्या वाड्यांचा विकास रखडला आहे. प्रशासन त्याबाबत काहीच हालचाल करायला तयार नाही व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचेही या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. एका संस्थेने पाहणी करून तयार केलेल्या अहवालाला तीन महिने झाले तरी महापालिका प्रशासनाने त्यावर काहीही केलेले नाही.हा अहवाल चर्चेला ठेवून त्यावर निर्णय होणे अपेक्षित होते. तो सरकारला पाठवायचा आहे. त्यानंतर सरकार त्यावर निर्णय घेणार आहे. राज्यातील अन्य शहरांच्या बाबतीत सरकारने आतापर्यंत हीच पद्धत अवलंबली आहे. सरकारनेच असा अहवाल तयार करून घेण्याविषयी महापालिकेला सुचवले होते. तरीही महापालिका या विषयात काही गती घ्यायला तयार नाही. धोकादायक म्हणून अनेक वाड्यांवर महापालिकेने नोटीस लावल्या आहेत. तरीही अशा वाड्यांमध्येसुद्धा अनेक भाडेकरू पर्यायच नाही म्हणून राहत आहेत. जागा लहान, भाडेकरूंची संख्या जास्त, मागण्या मोठ्या, त्यामुळे परवडत नाही म्हणून बांधकाम व्यावसायिक या जुन्या लहान वाड्यांकडे लक्षच द्यायला तयार नाहीत.त्यावर पर्याय म्हणून महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला क्लस्टर डेव्हलपमेंट अशा नावाने एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यात लहान क्षेत्रफळ असणाºया पण शेजारीशेजारी असलेल्या चार ते पाच वाड्यांच्या मालकांनी एकत्र येऊन इमारत बांधली तर परवानगी द्यावी, असे सुचवण्यात आले होते. मुंबईत ठाणे तसेच अन्य काही शहरांमध्ये अशा पद्धतीने जुन्या चाळी व वाड्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. नगरविकास मंत्रालयाने याला मान्यता दिली; मात्र तत्पूर्वी असे केले तर त्या इमारतींमध्ये जास्त सदनिका होतील, त्याचा नागरी सुविधांवर किती ताण येईल, महापालिकेची या सुविधा पुरवण्याची क्षमता आहे का याचा अभ्यास करण्यास सांगितले. ठाण्यात काम केलेल्या त्याच संस्थेचे नावही यासाठी सरकारनेच सुचवले.शिवसेनेचे विशाल धनवडेतसेच महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे श्रीनाथभिमाले हे शहराच्या मध्यभागातील नगरसेवक आहेत. तेही जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करीत आहेत.जुन्या वाड्यांमधील फक्त भाडेकरूच त्रासले आहेत असे नाही तर वाड्यांचे मालकही वैतागले आहेत. त्वरित निर्णय न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा धनवडे यांनी दिला.।अहवाल सादर : कार्यवाही नाहीमहापालिकेने वाडा पाहणीसाठी संस्थेची नियुक्ती केली. त्यांनी शहरातील वाड्यांची पाहणी करून अहवाल तयार करून महापालिकेला दिला आहे. किमान १० हजार चौरस फूट क्षेत्रफळ होत असले तर परवानगी द्यावी, त्यांना जादा एफएसआय किती द्यावा, लोकसंख्येवर त्याचा काय परिणाम होईल, ड्रेनेज व अन्य नागरी सुविधांवर त्याचा किती ताण येईल, अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव या अहवालात आहे.त्यावर आयुक्त तसेच महापालिका पदाधिकाºयांच्या दोन बैठकाही झाल्या. आता हा अहवाल सरकारला पाठवणे गरजेचे आहे, म्हणजे नगरविकास मंत्रालय त्यावर निर्णय घेईल; मात्र महापालिका प्रशासन व पदाधिकारी त्यावर काहीच करायला तयार नाहीत. अहवाल तयार होऊन तीन महिने झाले तरी यावर काहीच हालचाल झालेली नाही.