शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Pune Environment: जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे; पर्यावरणप्रेमींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:38 IST

सध्या प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रकाशित करत असून त्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा अजूनही दुर्लक्षितच

पुणे : विधानसभेच्या निवडणुका असल्याने आता कोणता उमेदवार पर्यावरणाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट करतो, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. भविष्यात पुणे शहरात टेकडी संवर्धन, पाणीटंचाई, पूरस्थिती याविषयी गंभीर समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी भावी आमदार काही ठोस पावले उचलतील का? जे पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देतील, त्यांनाच मतदान करावे, असे आवाहन देखील पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

सध्या प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रकाशित करत आहेत. त्यामध्ये पर्यावरणाचा मुद्दा अजूनही दुर्लक्षित आहे. त्यावर राजकीय पक्षांनी काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी पुण्यातील अनेक पर्यावरणवादी लोक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, जलदेवता अभियानाचे शैलेंद्र पटेल, वेताळ टेकडी बचाव कृती समितीचे सदस्य आदींचा समावेश आहे. ही मंडळी सातत्याने पर्यावरण बचावसाठी काम करत आहेत.

जाहीरनाम्यात हवेच हे मुद्दे

१) पुणेकरांना स्वच्छ हवा आणि मुबलक पाणीपुरवठा२) सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर व्हावा३) जमिनीवरील जलस्त्रोत अतिक्रमणमुक्त व प्रदूषणमुक्त करावे४) भूगर्भाची पातळी खालावत असून, ती सुधारण्यासाठी देखभाल यंत्रणा कार्यान्वित व्हावी५) शहरातील सर्व इमारतींवर पर्जन्यजल पुनर्भरण करण्यास प्राधान्य द्यावे६) हवेतील कर्बवायू अधिक शोषला जावा, यासाठी वृक्षलागवड व्हावी७) हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी खासगी वाहने कमी करून सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करावे८) तापमानवाढीवर शालेय विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न करावेत९) सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी हरित व पर्यावरणपूरक बांधकामांना प्राधान्य द्यावे१०) नागरी वस्त्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन द्यावे, रस्त्यावरील सर्व दिवे सौर ऊर्जेवर करावेत११) कचरा समस्या कमी करण्यासाठी खतप्रकल्प राबवावेत, व्यवस्थापन यंत्रणा अत्याधुनिक करावी१२) रस्त्यांवरील गटारीमध्ये शोष खड्डे करून वाहणारे पाणी भूजलात जाण्यासाठी प्रयत्न करावेत

पुण्याची लोकसंख्या ७० लाखांहून अधिक आहे. वाहनेदेखील ५० लाखांपेक्षा अधिक असल्याने सर्वसमस्या निर्माण होत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी योग्य नगरनियोजन करणे अपेक्षित असते, ते होत नाही. त्याविषयी जाहीरनाम्यात उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच पर्यावरणाचा मुद्दा समाविष्ट करून ते काम करण्यास प्राधान्य देऊ, असेही सांगावे, तरच त्यांना पुणेकरांनी मत द्यावे. - निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, पर्यावरणप्रेमी

पुण्यातील टेकड्या या शहराचे फुप्फुसे आहेत. त्यांचे संवर्धन केल्याने भविष्यात भूगर्भाची पातळी चांगली राहील. वेताळ टेकडी ही पावसाचे पाणी जिरवते आणि त्यामुळे भूगर्भातील पाण्यावर आजूबाजूचे लाखो लोक आपली तहान भागवतात. त्यामुळे टेकडीचे संवर्धन करणारा उमेदवार हवा. त्याने पर्यावरणासाठी काम करावे. टेकडीवरून जे तीन प्रकल्प प्रस्तावित आहेत, ते रद्द करण्यासाठी प्राधान्य द्यावे, तरच त्यांना पुणेकर मतदान करतील. - सुमिता काळे, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती

वेताळ टेकडी नैसर्गिक वारसा म्हणून घोषित करावे. ते घोषित करण्यासाठी उमेदवारांनी पाठपुरावा केला पाहिजे. जो उमेदवार यासाठी काम करण्याचे मान्य करेल, त्याला आम्ही मत देऊ. पुण्याचे पर्यावरण जपणे हीच आताची गरज आहे. - सुषमा दाते, सदस्य, वेताळ टेकडी बचाव कृती समिती

उमेदवारांनी यावर काम करावे

१) बालभारती ते पौड फाटा रस्ता टेकडीवरून नको२) एचसीएमटीआर हा टेकड्यांना फोडणारा प्रकल्प रद्द करा३) पंचवटीमार्गे जाणारे दोन बोगदे कायमचे बासनात घाला४) सार्वजनिक वाहतूक सक्षम करावी, खासगी वाहने कमी होतील

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणMaharashtraमहाराष्ट्रNatureनिसर्गMLAआमदारvidhan sabhaविधानसभा