शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाविरोधात गावे एकवटली;शेतकरी आक्रमक, जमीन न देण्याची शपथ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:10 IST

नायगाव, पांडेश्वरमध्ये आज होणार बैठक, हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून त्याची जागा निश्चित झालेली नाही. विमानतळ बाधित क्षेत्रात पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना असल्याने या ठिकाणचा शेतकरी ऊसशेती पिकवू लागला आहे. 

सोन्यासारख्या जमिनीवर विमानतळाचे भूत बसल्याने पुरंदरच्या पूर्व भागातील शेतकरी हैराण झाला आहे. याविरोधात येथील गावे एकत्र आले असून जमिनी न देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रजासत्ताक दिनाला नायगाव, पांडेश्वर येथे ही बैठक होणार आहे. जमीन न देण्याचा एकमुखी ठराव ही गावे करणार आहेत. पुरंदर विमानतळाविरोधात येथील गावे एकवटली आहे. कितीही  किंमत मोजावी लागली, तरी विमानतळ होऊ देणार नाही, असा बैठकीत निर्णय करुन विमानतळ विरोधी घोषणा देण्यात आल्या. हात वर करुन विमानतळास एक इंचभरही जमीन न देण्याची शपथ घेण्यात आली. यामुळे एकत्र येत विमानतळाला विरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

दिवसेंदिवस पुरंदर तालुक्यातील नियोजीत विमानतळ वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, मावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी पुरंदरच्या पूर्व भागातील गावोगावी बैठका घेण्यात येत आहेत. व विमानतळाला विरोध केला जात आहे.  कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे विमानतळ होऊन द्यायचे नाही. जमिनी द्यायच्या नाहीत या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. पुरंदर तालुक्यातील नियोजित सात गावांतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेत बदल करून पूर्व भागातील रिसे, पिसे, पांडेश्वर व आसपासच्या परिसरात विमानतळ हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध दर्शविण्यासाठी नायगाव व पांडेश्वर येथे ग्रामस्थांनी बैठकीचे नियोजन केले आहे. यावेळी विमानतळ आमच्याकडे नकोच, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. आमच्या वडिलोपार्जित जमिनी जबरदस्तीने विमानतळासाठी बळकावून आम्हाला भकास करू नका. असा सूर येथील शेतकऱ्यांनी लावला आहे. 

सर्वपक्षीय कार्यकर्ते राहणार उपस्थित २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पूर्व भागातील विमानतळबाधित सर्व गावांची बैठक नायगाव येथील सिध्देश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच या बैठकीला सर्व गावातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना बोलवणे. व त्यांची विमानतळ विषयी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचे ठरले आहे. जागा निश्चित न झाल्याने पुरंदर तालुक्यातील विनामतळाला पुन्हा विरोध होण्यास सुरूवात झाली आहे. तर खेड तालुक्यात विरोध मावळत आहे. बारामतीच्या विकासाठीच हे विमानळ पुरंदरला होत असल्याचा आरोप होत आहे. 

 

टॅग्स :Airportविमानतळ