शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

रासायनिक प्रकल्पांचा गावांना त्रास,प्रशासकीय, राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:35 AM

रासायनिक प्रकल्पातील अनेक घटना या काही अंशी दुर्दैवी जरी असल्या, तरी त्या मानवनिर्मितच आहेत. जवळपास तीस वर्षांपासून उभा राहिलेल्या या प्रकल्पाला सर्वच स्तरातून दुर्लक्षित केले गेले आहे.

कुरकुंभ : येथील रासायनिक प्रकल्पातील अनेक घटना या काही अंशी दुर्दैवी जरी असल्या, तरी त्या मानवनिर्मितच आहेत. जवळपास तीस वर्षांपासून उभा राहिलेल्या या प्रकल्पाला सर्वच स्तरातून दुर्लक्षित केले गेले आहे. परिणामी, त्याचे दुष्परिणाम कुरकुंभ, पांढरेवाडी व परिसरातील गावांना सोसावे लागले.मात्र, हा त्रास सहन करत असताना अनेक आमदार, खासदार, मंत्री विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी त्यांचा त्रास फक्त पाहण्यापलीकडे काहीच केले नाही, असेच म्हणावे लागेल. अनेक वर्षांपासून या प्रकल्पात अनेक सामान्य कामगारांच जीव गेलेला आहे. मात्र, त्याची गंभीर दखल घेण्यात टाळाटाळ करून आपली आर्थिक पोळी शेकून घेण्यापलीकडे आजपर्यंत काहीच झालेले नाही हे वास्तव आज कुरकुंभ येथे आल्यावर माहीत पडते.कुरभावी पिढीसाठी आपण काहीतरी करीत आहोत. या भावनेतून ज्या लोकांनी हा निर्णय घेतला तो निर्णय कदाचित काही अंशीच खरा ठरला कारण जी स्वप्ने दाखवून हा प्रकल्प उभारला गेला त्याची अवस्थादेखील अन्य प्रकाल्पासारखीच झाली. जमिनी गेल्या व वाट्याला आला तो रासायनिक प्रक्रियेचा घातक दुष्परिणाम, हाताला काम नाही व कसायला जमिनीच उरल्या नाहीत. कारण, प्रदूषणाने परिसरातील जवळपास सर्व जमिनी ह्या बाधित झाल्या त्यामुळे शिकलेल्या मुलांना रोजगार मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांची दारे झिजवण्या पलीकडे काहीच हाती आले नाही .या रासायनिक प्रकल्पाच्या उभारणीत साठ टक्के रासायनिक व चाळीस टक्के अन्य उद्योगांना प्राधान्य देण्याचे ठरले मात्र रासायनिक प्रकल्पामुळे अन्य उद्योगांनी या औद्योगिक क्षेत्राकडे पाठ फिरवली. परिणामी,मोकळ्या जागादेखील रासायनिक उद्योगाला देण्यात आल्या. दरम्यान एकाच दिवशी एकाच वेळेस जवळपास पंधराशे एकर जागा शासनाला वर्ग करण्यात आली होती. ग्रामस्थांनी एकमुखाने सभा घेऊन ठराव मंजूर करून परिसरात आर्थिक क्रांती येणार या उद्देशाने आपल्या जमिनी आवर्जून दिल्या होत्या. परिणाम प्रत्यक्षात हे उद्योग आल्यावर झाला अन् ग्रामस्थांच्या या प्रयत्नांवर नांगरच फिरला.या रासायनिक प्रकल्पात मोठ मोठ्या उद्योगपतींचे उद्योग आजमितीस मोठ्या दिमाखदारपणे उभे आहेत. राजकीय पाठबळावर त्यांनी एका मागोमाग एक असे अनेक कंपन्या या प्रकल्पात उभ्या केल्या. प्रदूषणाचे कुठलेही नियम नपळता सांडपाणी उघड्यावर सोडले.