शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

गावचा सरपंच मुख्यमंत्री होऊ शकतो, दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 23:25 IST

दिलीप वळसे-पाटील : ग्रामस्थांनी केला शांतारामबापूंचा हृद्य सत्कार

भुलेश्वर : ग्रामीण भागातून गावपातळीवर विकासाचे काम करणारे नेतृत्व पुढे आले. त्यातूनच राज्यात आमदार, खासदार, मंत्री व मुख्यमंत्री झालेले अनेक आहेत. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख होय, म्हणूनच ग्रामस्थांनी नेतृत्वाची जडणघडण जाणीवपूर्वक करावी. गावात चांगले काम करणारा सरपंच भविष्यात मुख्यमंत्रीही होऊ शकतो, असे मत विधान परिषदेचे माजी सभापती दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली.

मौजे पिसर्वे (ता. पुरंदर) येथील ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच शांतारामबापू कोलते यांचा अमृतमहोत्सव व प्रगतिशील शेतकरी सुरेश विनायक कोलते यांच्या एकसष्टीनिमित्त वळसे-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावातील नागरिकांच्या सहकार्याने विकासकामे करू शकलो. सर्वांना बरोबर घेऊन गावचे गावपण जपले. पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, खरीप बंधारे, विजेचे उपकेंद्र, बँक, वाचनालय आदी सुविधा निर्माण केल्या. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मागे लागून पुरंदर उपसासिंचन योजनेचे पाणी गावच्या शिवारात फिरवल्यामुळे हरितक्रांती झाल्याच्या भावना सत्काराला उत्तर देताना शांतारामबापू व सुरेश कोलते यांनी व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विजय कोलते यांनी प्रास्ताविक केले. संभाजी कोलते, तानाजी कोलते, जालिंदर कामठे, सुदाम इंगळे, अशोक टेकवडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsarpanchसरपंचPuneपुणे