शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Vidhan Sabha 2019 : कधीच कोणाचे दिवस नसतात ; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टाेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 17:46 IST

पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेला अनेकांनी विविध पद्धतीने विराेध केला. जनादेश यात्रेसाठी अनेकांची धरपकड करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना कधीही दडपशाही केली नाही. महाराष्ट्र पाण्यात गेला तरीही जनादेश यात्रा थांबविण्यात आली नाही. गेल्या दाेन महिन्यात साडेतीनशे जी आर काढण्यात आले. निवडणूक आली की लाेकांना प्रलाेभने दाखविण्याचे काम सरकार करते. सत्तेची मस्ती सरकारला चढली आहे. असे म्हणत मुख्यमंत्री साहेब कधीच काेणाचे दिवस नसतात असा टाेला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

पुण्यातील आण्णाभाऊ साठे रंगमंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आलेे हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्थित हाेते.  

पवार म्हणाले,  शिक्षणाचा खेळ खंडोबा केल्याने शिक्षण खातं विनोद तावडे यांच्याकडून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं.  5 वर्ष सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. लोकांची दिशाभूल करण्याचं काम भाजपकडून लोकसभेला करण्यात आलं. आता कलम 370 पुढे करून विधानसभेला लाेकांची दिशाभूल करण्यात येत आहे. काश्मीर मधील निवडून आलेले नेते अजूनही नजर कैदेत आहेत. गुलाब नबी आझाद यांना काश्मीर मध्ये जाण्यासाठी सर्वोच न्यायालयात जावं लागलं. 

पुण्याबद्दल बाेलताना पवार म्हणाले पुण्यातील सर्व धरणं भरली असली तरी पाण्यासाठी पुणेकरांना आंदोलने करावी लागत आहेत. मी 10 वर्ष पालकमंत्री असताना दुष्काळ असताना देखील पुण्याला पाणी कमी पडु दिले नाही. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून दुसरीकडे अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत.भामा असखेडच्या प्रकल्पला आम्ही मंजुरी दिले तरी त्यांना 5 वर्षात पाईपलाईन टाकता आली नाही.पुण्याचे प्रश्न एकही आमदार विधानभेत मांडताना दिसले नाही.निवडणुक आली की राम मंदिर, जात, धर्म यावर राजकारण भाजपा करते. आम्ही अनेक गोष्टी केल्या पण त्याचा गाजा वाजा केला नाही. 

घाेटाळे बाहेर निघु नये म्हणून पक्षांतर घाेटाळे बाहेर निघु नये म्हणून अनेकांनी पक्षांतर केले असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. अनेकांच्या साखर कारखान्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन भाजपात घेतले असल्याचे देखील पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस