शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 14:10 IST

शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी..

ठळक मुद्दे शहरातील तरुणवर्ग तरुण मंडळानी पुढाकार घेणे गरजेचे  ...तर ग्राहकांना देखील ताजा स्वच्छ भाजीपाला मिळण्यास मदत होणार

बारामती : समाज माध्यमाचा वापर करून शेतकरी थेट ग्राहकाला शेतमाल विक्रीसाठी पुढे येत  आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजी,  जयसिंगपूर, पुणे आदी शहरातील ग्राहकाला शेतमाल जागेवर पुरवत आहोत. सध्या घरात असलेल्या  शहरी तरुणांनी देखील यामध्ये पुढाकार घेत आपल्या कॉलनी, सोसायटी  किंवा परिसरातील नागरिकांची गरज ओळखून थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळे खरेदी करावा. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.  शहरी तरुण वर्गाने या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे,  असे आवाहन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना केले.  सध्या लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.  या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी लोकमतने संवाद साधला. यावेळी बोलताना माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले,  व्यापारीवर्ग साखळी करून या परिस्थितीचा फायदा उचलणार त्यामध्ये नवीन काही नाही. मात्र शेतकऱ्याने देखील स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे.  आज शेतकऱ्यांच्या तरुणपिढीच्या हाती अँड्रॉइड मोबाईल आहेत. समाज माध्यमातून शहरी आणि ग्रामीण तरुण जोडले गेले आहेत.  त्यामुळे शेतकरी तरुणांनी आपल्या जवळ असणाऱ्या शेतमालाची माहिती शेअर करावी.  तसेच शहरी तरुणांनी देखील आपल्या कॉलनीला परिसरातील रहिवाश्याना हवा असणारा भाजीपाला, फळे खरेदी करावीत. थेट विक्रेता आणि ग्राहक असा संबंध आल्यामुळे दोघांनाही हा व्यवहार परवडणार आहे.  इतरवेळी यामध्ये सक्रिय असणाऱ्या  व्यापारी व दलालांमुळे नफेखोरी वाढते.  त्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी किमतीत शेतमाल खरेदी करून ग्राहकांना शेतमाल विकताना त्याची किंमत मोठ्याप्रमाणात वाढते.  नफेखोरी टाळण्यासाठी या मार्गाचा अवलंब शेतकरी वर्गाने करावा.  ज्याप्रमाणे काही शेतकरी सामूहिक शेती करतात त्याच पद्धतीने सामूहिक विक्रीपद्धत समाज माध्यमातून शेतकरी राबवू शकतात. शेतकरी प्रत्येक घरी जाऊन शेतमाल विकू शकत नाही. त्यासाठी शहरामध्ये विविधभागात असणाऱ्या  तरुण मंडळानी आपल्याला कॉलनीला,  सोसायटीला किती दिवसाला किती भाजीपाला लागतो. त्याची यादी केली व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सामूहिक पद्धतीने तेथे पाठवला तर ग्राहकांना देखील ताजा स्वच्छ भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे. आम्ही असे प्रयोग मागील पंधरा दिवसांपासून सुरू केले आहेत. इचलकरंजी,  जयसिंगपूर ते पुणे येथील तरुण मंडळाशी सातत्याने संपर्क ठेवून ताजा स्वच्छ शेतमाल पाठवला जात आहे.  त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आता ग्राहकांच्या मागणीनुसार कोकणातील आंबा देखील आम्ही मागवला आहे,  असे माजी खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी... लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे द्राक्ष, केळी, भाजीपाला आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ही संख्या मोठी नाही. परंतु झालेले नुकसान शेतकऱ्यांना पेलवण्याच्या पलीकडे आहे. अशा शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी, अशी मागणी देखील यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.  

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSocial Mediaसोशल मीडियाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस