शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 14:10 IST

शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी..

ठळक मुद्दे शहरातील तरुणवर्ग तरुण मंडळानी पुढाकार घेणे गरजेचे  ...तर ग्राहकांना देखील ताजा स्वच्छ भाजीपाला मिळण्यास मदत होणार

बारामती : समाज माध्यमाचा वापर करून शेतकरी थेट ग्राहकाला शेतमाल विक्रीसाठी पुढे येत  आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजी,  जयसिंगपूर, पुणे आदी शहरातील ग्राहकाला शेतमाल जागेवर पुरवत आहोत. सध्या घरात असलेल्या  शहरी तरुणांनी देखील यामध्ये पुढाकार घेत आपल्या कॉलनी, सोसायटी  किंवा परिसरातील नागरिकांची गरज ओळखून थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळे खरेदी करावा. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.  शहरी तरुण वर्गाने या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे,  असे आवाहन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना केले.  सध्या लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.  या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी लोकमतने संवाद साधला. यावेळी बोलताना माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले,  व्यापारीवर्ग साखळी करून या परिस्थितीचा फायदा उचलणार त्यामध्ये नवीन काही नाही. मात्र शेतकऱ्याने देखील स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे.  आज शेतकऱ्यांच्या तरुणपिढीच्या हाती अँड्रॉइड मोबाईल आहेत. समाज माध्यमातून शहरी आणि ग्रामीण तरुण जोडले गेले आहेत.  त्यामुळे शेतकरी तरुणांनी आपल्या जवळ असणाऱ्या शेतमालाची माहिती शेअर करावी.  तसेच शहरी तरुणांनी देखील आपल्या कॉलनीला परिसरातील रहिवाश्याना हवा असणारा भाजीपाला, फळे खरेदी करावीत. थेट विक्रेता आणि ग्राहक असा संबंध आल्यामुळे दोघांनाही हा व्यवहार परवडणार आहे.  इतरवेळी यामध्ये सक्रिय असणाऱ्या  व्यापारी व दलालांमुळे नफेखोरी वाढते.  त्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी किमतीत शेतमाल खरेदी करून ग्राहकांना शेतमाल विकताना त्याची किंमत मोठ्याप्रमाणात वाढते.  नफेखोरी टाळण्यासाठी या मार्गाचा अवलंब शेतकरी वर्गाने करावा.  ज्याप्रमाणे काही शेतकरी सामूहिक शेती करतात त्याच पद्धतीने सामूहिक विक्रीपद्धत समाज माध्यमातून शेतकरी राबवू शकतात. शेतकरी प्रत्येक घरी जाऊन शेतमाल विकू शकत नाही. त्यासाठी शहरामध्ये विविधभागात असणाऱ्या  तरुण मंडळानी आपल्याला कॉलनीला,  सोसायटीला किती दिवसाला किती भाजीपाला लागतो. त्याची यादी केली व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सामूहिक पद्धतीने तेथे पाठवला तर ग्राहकांना देखील ताजा स्वच्छ भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे. आम्ही असे प्रयोग मागील पंधरा दिवसांपासून सुरू केले आहेत. इचलकरंजी,  जयसिंगपूर ते पुणे येथील तरुण मंडळाशी सातत्याने संपर्क ठेवून ताजा स्वच्छ शेतमाल पाठवला जात आहे.  त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आता ग्राहकांच्या मागणीनुसार कोकणातील आंबा देखील आम्ही मागवला आहे,  असे माजी खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी... लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे द्राक्ष, केळी, भाजीपाला आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ही संख्या मोठी नाही. परंतु झालेले नुकसान शेतकऱ्यांना पेलवण्याच्या पलीकडे आहे. अशा शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी, अशी मागणी देखील यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.  

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSocial Mediaसोशल मीडियाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस