शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

लॉकडाऊन काळात शेतमाल विक्रीसाठी समाज माध्यमाचा वापर करावा : राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 14:10 IST

शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी..

ठळक मुद्दे शहरातील तरुणवर्ग तरुण मंडळानी पुढाकार घेणे गरजेचे  ...तर ग्राहकांना देखील ताजा स्वच्छ भाजीपाला मिळण्यास मदत होणार

बारामती : समाज माध्यमाचा वापर करून शेतकरी थेट ग्राहकाला शेतमाल विक्रीसाठी पुढे येत  आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजी,  जयसिंगपूर, पुणे आदी शहरातील ग्राहकाला शेतमाल जागेवर पुरवत आहोत. सध्या घरात असलेल्या  शहरी तरुणांनी देखील यामध्ये पुढाकार घेत आपल्या कॉलनी, सोसायटी  किंवा परिसरातील नागरिकांची गरज ओळखून थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला, फळे खरेदी करावा. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.  शहरी तरुण वर्गाने या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे,  असे आवाहन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकमतशी बोलताना केले.  सध्या लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.  या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी लोकमतने संवाद साधला. यावेळी बोलताना माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले,  व्यापारीवर्ग साखळी करून या परिस्थितीचा फायदा उचलणार त्यामध्ये नवीन काही नाही. मात्र शेतकऱ्याने देखील स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे.  आज शेतकऱ्यांच्या तरुणपिढीच्या हाती अँड्रॉइड मोबाईल आहेत. समाज माध्यमातून शहरी आणि ग्रामीण तरुण जोडले गेले आहेत.  त्यामुळे शेतकरी तरुणांनी आपल्या जवळ असणाऱ्या शेतमालाची माहिती शेअर करावी.  तसेच शहरी तरुणांनी देखील आपल्या कॉलनीला परिसरातील रहिवाश्याना हवा असणारा भाजीपाला, फळे खरेदी करावीत. थेट विक्रेता आणि ग्राहक असा संबंध आल्यामुळे दोघांनाही हा व्यवहार परवडणार आहे.  इतरवेळी यामध्ये सक्रिय असणाऱ्या  व्यापारी व दलालांमुळे नफेखोरी वाढते.  त्यामुळे शेतकऱ्यांकडून कमी किमतीत शेतमाल खरेदी करून ग्राहकांना शेतमाल विकताना त्याची किंमत मोठ्याप्रमाणात वाढते.  नफेखोरी टाळण्यासाठी या मार्गाचा अवलंब शेतकरी वर्गाने करावा.  ज्याप्रमाणे काही शेतकरी सामूहिक शेती करतात त्याच पद्धतीने सामूहिक विक्रीपद्धत समाज माध्यमातून शेतकरी राबवू शकतात. शेतकरी प्रत्येक घरी जाऊन शेतमाल विकू शकत नाही. त्यासाठी शहरामध्ये विविधभागात असणाऱ्या  तरुण मंडळानी आपल्याला कॉलनीला,  सोसायटीला किती दिवसाला किती भाजीपाला लागतो. त्याची यादी केली व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सामूहिक पद्धतीने तेथे पाठवला तर ग्राहकांना देखील ताजा स्वच्छ भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे. आम्ही असे प्रयोग मागील पंधरा दिवसांपासून सुरू केले आहेत. इचलकरंजी,  जयसिंगपूर ते पुणे येथील तरुण मंडळाशी सातत्याने संपर्क ठेवून ताजा स्वच्छ शेतमाल पाठवला जात आहे.  त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आता ग्राहकांच्या मागणीनुसार कोकणातील आंबा देखील आम्ही मागवला आहे,  असे माजी खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी... लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे द्राक्ष, केळी, भाजीपाला आणि फुल उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ही संख्या मोठी नाही. परंतु झालेले नुकसान शेतकऱ्यांना पेलवण्याच्या पलीकडे आहे. अशा शेतकऱ्यांचा सर्व्हे करून त्यांना योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून मिळायला हवी, अशी मागणी देखील यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.  

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीSocial Mediaसोशल मीडियाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस