शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; शेती पिकांचे अतोनात नुकसान, हजारो शेळ्या - मेंढ्या दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 19:59 IST

शेतक-यांच्या शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यंत्रणेला दिले

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी अतिवृष्टी व थंडीने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे जिल्ह्यात तब्बल १ हजार १३५ शेळ्यामेंढ्या दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर शेतक-यांच्या शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यंत्रणेला दिले आहेत. 

जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना ऐन थंडीत गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने पुणे जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस रात्री उशीरापर्यंत धो-धो कोसळत होता. पावसासोबतच प्रचंड कडाक्याची थंडी पडल्याने याचा फार मोठा फटका रानोमाळ फिरणाऱ्या मेंढपाळ व शेतक-यांना बसला. एकाच वेळी धुवाधार पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे जिल्ह्यात तब्बल १ हजार १३४ शेळ्यामेंढ्या दगावल्या आहेत. तर काही ठिकाणी मोठी जनावरे देखील मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात शेतीपिकाला प्रचंड फटका बसला आहे. द्राक्षबागाबरोबरच लागवडीला आलेले कांद्याची रोप भुईसपाट झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू, हरभरा व अन्य सर्व कडधान्य वाय गेल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही ठिकाणी घरांची व गुरांच्या गोठ्याची पडझड देखील झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यात शेळा-मेढ्यांचे तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज 

तालुका      गाव      शेळ्यामेंढ्या (मृत्यू) आंबेगाव    10           169शिरूर        05           109खेड           04             73जुन्नर         15         541हवेली        02             17भोर           1               02मावळ       02            36बारामती     06          40दौंड           03            24पुरंदर         07          119

टॅग्स :zpजिल्हा परिषदPuneपुणेRainपाऊसWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी