शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज : सत्यपाल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:59 PM

कार्यशाळांमध्ये सादर होणाऱ्या शोधनिबंधांचा दर्जा अत्यंत सुमार असतो, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय कार्यशाळा असे नाव दिले जाते...

ठळक मुद्दे७३३८ विद्यार्थ्यांना पदवी, ९० विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि ५० विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान आज इच्छा असूनही अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचित

पुणे : देशात पीएच.डी. पदवी संपादन करणाऱ्यांची सर्वाधिक आहे. मात्र या पीएच.डीमधून होणारे संशोधन हा चिंतेचा विषय आहे. केवळ पदोन्नती मिळविण्यासाठी प्राध्यापकांकडून पीएच.डीच्या पदव्या मिळविल्या जात आहेत. सर्जनशीलता आणि नवनिर्मिती याचे दर्शन संशोधनातून घडले पाहिजे अशा प्रकारच्या गुणवत्तापूर्ण संशोधनाची मानसिकता निर्माण करण्याचे मोठे आव्हान विद्यापीठांसमोर आहे असे मत केंद्रीय मानव संसाधन विकास (उच्च शिक्षण) राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले.         भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या १९ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापते तसेच सर्व विद्या शाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन आणि विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते. या समारंभात ७३३८ विद्यार्थ्यांना पदवी, ९० विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि ५० विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले, ‘‘देशात ८ हजार ६४ विद्यापीठे आहेत, या विद्यापीठांमधून मोठयाप्रमाणात पीएच.डी घेऊन विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र त्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. देशातील अनेक महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये आयोजित विविध विषयांवरील कार्यशाळांची मला निमंत्रणे येतात. या कार्यशाळांमध्ये सादर होणाऱ्या शोधनिबंधांचा दर्जा अत्यंत सुमार असतो, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय कार्यशाळा असे नाव दिले जाते. याबाबत कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत मी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर असे प्रकार कमी होऊ लागले आहेत. विद्यापीठात होणारे संशोधन प्रयोगशाळांमध्येच मर्यादित न राहता ते समाजापर्यंत पोहचले पाहिजे. आज इच्छा असूनही अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. उच्च शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी विद्यापीठांनी पय्रत्न केले पाहिजेत.’’ माणिकराव साळुंखे म्हणाले, ‘‘एनआरएफ रँकिंगमध्ये भारती विद्यापीठाची ८ महाविद्यालये अव्वल ठरली आहेत. भारती विद्यापीठाला ६६ वी रँक मिळाली आहे. त्याचबरोबर नॅक मुल्यांकनामध्ये ए प्लस मिळाले आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टिने अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.’’ शिवाजीराव कदम यांनी यावेळी विचार मांडले. प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कुलसचिव जी. जयकुमार यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेSatyapal Singhसत्यपाल सिंगbharti universityभारती विद्यापीठStudentविद्यार्थी