शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

Union budget2019: पैशांच्या तरतुदीने सबलीकरण होईल? महिलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 07:00 IST

प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे सीमारामन यांनी अधोरेखित केले...

ठळक मुद्देसमानतनेचे वातावरण तयार व्हायला हवे

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नारी ते नारायणी चा नारा देत महिला सक्षमीकरणाची ग्वाही दिली. मात्र, केवळ पैशांची तरतूद आणि घोषणांचा पाऊस यामुळे सबलीकरण होणार का, असा सवाल विविध क्षेत्रातील महिलांकडून उपस्थित करण्यात आला आहे.महिला सक्षम असेल तर देश सक्षम होईल, अशी शिकवण स्वामी विवेकानंदांनी दिली. त्याचा दाखला देत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे सीमारामन यांनी अधोरेखित केले. जनधन योजनेत खाते असलेल्या महिलेला पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट काढता येईल आणि बचतगटांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ म्हणाल्या, विकासासाठी पैसा आवश्यक आहेच; मात्र, केवळ पैशांची तरतूद करुन सक्षमीकरण होणार नाही. महिलांमध्ये जाणीव-जागृती आवश्यक आहे की नाही, हे महत्वाचे आहे. महिला वैचारिकदृष्टया समर्थ व्हाव्यात, यासाठी कार्यक्रम घ्यायला हवेत. महिला विचार करु लागल्या तर योग्य निर्णय घेण्यास त्या उद्युक्त होतील.ह्णज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर म्हणाल्या, ह्यअसंघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाणही मोठे आहे. अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. केवळ कर्ज देऊन महिलांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. पैसे देऊन सबलीकरण कसे होईल? शेरोशायरी जास्त आणि ठोस आकडेवारी कमी अशी अर्थसंकल्पाची स्थिती आहे. पेट्रोल, डिझेल महागल्याचा फटकाही सर्वसामान्यांना बसणार आहे.------------महिलांची कामाच्या ठिकाणची संख्या आजही कमी आहे. बचतगटांना पुढे आणणे, आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मात्र, बचतगटांमधून कर्ज घेऊन महिला ते पैसे कुठे वापरतात, हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. केवळ कर्ज मिळते म्हणून ते पैसे स्वत:साठी वापरले न गेल्यास काय उपयोग? महिला निर्णय प्रक्रियेत महत्वाच्या ठरतात का, हा कळीचा मुद्दा आहे. समानतेची भाषा करताना त्यासाठी पूरक वातावरण निर्माण होणेही गरजेचे आहे. कायद्यांना बळकटी देऊन त्यांची अंमलबजावणीची तरतूद अर्थसंकल्पात असायला हवी. असंघटित कामगारांमध्ये महिलांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तळमळीने काम केले पाहिजे. अन्यथा धोरणे केवळ कागदावरच मर्यादित राहतील.- अ‍ॅड. रमा सरोदे

टॅग्स :PuneपुणेUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनWomenमहिला