शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली अन् पाकिस्तानचा जळफळाट - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 13:37 IST

जगाच्या व्यासपीठावर भारताबद्दल काहीच करता येत नसल्याने पाकिस्तान अस्वस्थ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली व सामर्थ्यशाली होत आहे. त्यामुळे जगाच्या व्यासपीठावर भारताबद्दल काहीच करता येत नसल्याने पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यामधूनच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी केळकर चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला. बावनकुळे यांच्यासह आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे तसेच प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक व भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, राज्यात १२०० ठिकाणी एकाचवेळी हे आंदोलन होत आहे. हताश झालेल्या पाकिस्तानला जगात काहीच किंमत राहिलेली नाही. मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचीच ही कमाल आहे. काहीच करता येत नसलेल्या पाकिस्तानी नेत्यांना आता मोदींवर टीका करण्याशिवाय पर्यायच नाही.

मुंबईतील महाविकास आघाडीच्या मोर्चावरही बावनकुळे यांनी टीका केली. राज्यातील नव्या सरकारने विकासाची बुलेट ट्रेन सुरू केली आहे. यातून आपले राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल याची भीती वाटून महाविकास आघाडीने हा मोर्चा काढला. त्यांच्याच नेत्यांनी महापुरुषांचा वारंवार अपमान केला आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तानBJPभाजपा