शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली अन् पाकिस्तानचा जळफळाट - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 13:37 IST

जगाच्या व्यासपीठावर भारताबद्दल काहीच करता येत नसल्याने पाकिस्तान अस्वस्थ

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली व सामर्थ्यशाली होत आहे. त्यामुळे जगाच्या व्यासपीठावर भारताबद्दल काहीच करता येत नसल्याने पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यामधूनच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी केळकर चौकात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला. बावनकुळे यांच्यासह आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे तसेच प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक व भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, राज्यात १२०० ठिकाणी एकाचवेळी हे आंदोलन होत आहे. हताश झालेल्या पाकिस्तानला जगात काहीच किंमत राहिलेली नाही. मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचीच ही कमाल आहे. काहीच करता येत नसलेल्या पाकिस्तानी नेत्यांना आता मोदींवर टीका करण्याशिवाय पर्यायच नाही.

मुंबईतील महाविकास आघाडीच्या मोर्चावरही बावनकुळे यांनी टीका केली. राज्यातील नव्या सरकारने विकासाची बुलेट ट्रेन सुरू केली आहे. यातून आपले राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल याची भीती वाटून महाविकास आघाडीने हा मोर्चा काढला. त्यांच्याच नेत्यांनी महापुरुषांचा वारंवार अपमान केला आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तानBJPभाजपा