शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उजनीतील पाणीसाठा झाला निम्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:43 IST

१५ धरणांतून पाणी सोडले; ३ दिवसांत पावणेपाच टीएमसी पाणी झाले जमा

पुणे : जिल्ह्यातील बहुतांश धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने सोलापूरची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २७.१२ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत उजनीत ४.७५ टीएमसी पाणी जमा झाले आहे. शनिवारीदेखील जिल्ह्यातील २४ धरणांपैकी १५ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे उजनीतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.जिल्ह्यातील माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रात ३, डिंभे १, कळमोडी ६, भामा-आसखेड २, वडीवळे २०, आंद्रा २, पवना १९, मुळशी २६, टेमघर ३१, वरसगाव १६, पानशेत १२ आणि खडकवासला धरण क्षेत्रात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणी धरण क्षेत्रात ४ आणि नीरा देवघरला २१ मिलिमीटर पाऊस झाला.शनिवारी सकाळी आठपर्यंत पिंपळगाव जोगे २१, माणिकडोह २९, कळमोडी १६, वडीवळे ४६, आंद्रा ११, पवना ४८, मुळशी २७, टेमघर ५८, वरसगाव ३३ आणि पानशेतला ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.धरणक्षेत्रात संततधार सुरु असल्याने खडकवासला प्रकल्पातील वरसगाव धरणातून ६ हजार ७९, पानश्ेत १ हजार ९५४ आणि पुढे खडकवासल्यातून ११ हजार ७६७ क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी मुठा नदी दुथडी भरून वाहिली. मुळशी ५ हजार, कासारसाई ४००, पवना २ हजार २०८, आंद्रा ५१६, वडीवळे १३७, चासकमान ३ हजार २०, कळमोडी ५९१, डिंभे ५ हजार ३७९ आणि वडज धरणातून ८०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.उपयुक्त पाणीसाठा २७.१२ टीएमसीजिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २७.१२ टीएमसी (५०.६१ टक्के) झाला आहे. उजनीत १६ अ‍ॅगस्ट रोजी सकाळी २२.३७ टीएमसी साठा होता. त्यात शनिवारी (दि. १८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४.७५ टीएमसीची भर पडली. नीरा देवघरमधून ६ हजार ८०८, भाटघर ५ हजार ६४ आणि वीर धरणातून १३ हजार ९९१ क्युसेक्सपाणी नदीत सोडण्यात आले.खडकवासला प्रकल्पातील वरसगाव धरणात १२.८२, पानशेत १०.६५, खडकवासला १.९७ (सर्व शंभर टक्के) आणि टेमधर धरणात २.२४ (६०.३१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांत मिळून २७.६८ टीएमसी (९४.९५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात चारही धरणांत मिळून २४.८३ टीएमसी (८५.१७ टक्के) पाणीसाठा होता.

टॅग्स :PuneपुणेDamधरण