शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

Ujani Dam: पाऊस फुल धरण हाऊसफुल! उजनी १०० टक्के भरले; बळीराजाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:31 IST

धरणात एकूण पाणीपातळी ४९६.८१ मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल ११८ टीएमसीपर्यंत गेला आहे

कळस : उजनी धरण सध्या शंभर टक्क्यांवर गेले असून ११८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दौंडवरुनधरणात ४६ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. धरण हाऊसफुल्ल झाले असून भीमा नदीत ३० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरण पुर्ण भरले असून धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  जुलै महिन्यात झालेल्या तसेच दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात खडकवासलासह सर्वच धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ते अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणाने  १०० टक्क्यांची पाणी पातळी गाठली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरण उणे पातळीत होते. उजनी जलाशयावरील खडकवासलासह १९ धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडले जाते आहे. 

उजनी धरणामध्ये पूर्वी ६० हजार क्युसेक, त्यानंतर कमी कमी होत ६ हजार क्युसेक असा विसर्ग झाला होता. दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे  विसर्गात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवार दि १२ रोजी दौंड येथून उजनी धरणात ४६ हजार क्युसेक इतके पाणी सोडले जात होते. धरणात एकूण पाणीपातळी ४९६.८१ मीटरपर्यंत पोहोचली असून एकूण पाणीसाठा तब्बल ११८  टीएमसीपर्यंत गेला आहे. त्यापैकी धरणात उपयुक्त पाणीसाठा ५३.८७ टीएमसी  झाला आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीRainपाऊसSolapurसोलापूरdaund-acदौंड