शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Ujani Dam| उजनीत २९ दिवसांत ९७.१० टक्के पाणी साठा जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:33 IST

रणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ..

बाभुळगाव (पुणे) : पाणी साठवण क्षमतेने राज्यात सर्वांत मोठे असलेल्या भीमानगर (ता.माढा) येथील उजनी धरणात अवघ्या तीस दिवसांत ९७.१० टक्के पाणी साठा जमा झाला आहे. धरणात दौंड येथील नदीमार्गे येणारा पाणी विसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

उजनी धरण आणखी आठवडाभरात पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे, तर उजनी धरणात सध्या ८४.३३ टक्के पाणी साठा झाला असल्याची माहिती उजणी पाटबंधारे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी दिली. या अगोदर जुलै महिन्याच्या सुरुवातीला उजनी धरण वजा १२.७७ टक्के इतके होते. सध्या उजनी धरणात दौंडवरून सध्या ७ हजार ८६९ क्यूसेकने पाणी विसर्ग येत आहे.

८ जुलै २०२२ रोजी धरणातील मृत साठ्यापैकी वजा-१२.७७ टक्के पाणी कमी झाले होते.मागील वर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला उजनी ४० टक्के भरले होते. चालू वर्षी धरण रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ८४.३३ टक्के इतके भरले आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी ४९६.१०० मीटर आहे. धरणात १०८.८४ टीएमसी इतका पाणी साठा असून, उपयुक्त पाणीसाठा हा ४५.१८ टीएमसी आहे, तर उजनी धरणातून सिना माढा बोगदा २५९ क्यूसेक, दहीगाव एलआयएस ४३ क्यूसेक व छोटा कॅनलमधून २०० क्यूसेक असा एकूण ५०२ क्यूसेकने पाणी विसर्ग सुरू असल्याची माहिती उजनी प्रशासनाने दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरणSolapurसोलापूरBaramatiबारामती