शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बळीराजाची चिंता मिटली! उजनी धरणं भरलं ९० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:05 IST

इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणं ९० टक्के भरले असून त्यावर अवलंबुन असणार्‍या शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे.

ठळक मुद्देपाऊस असाच राहिला तर धरणं लवकरच १०० टक्के भरणार

बाभुळगाव : इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी ९० टक्के भरले असून धरणावर अवलंबून असलेल्या बळीराजाची चिंता मिटल्याचं दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात कोरोना महामारीचं संकट, लाॅकडाऊन, अतिवृृृष्टीचे संकट यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजणी धरण क्षेत्रात पाऊसही कमी झाला होता. त्यामुळं उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यास वेळ लागत होता. मात्र इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणं ९० टक्के भरले असून त्यावर  अवलंबुन असणार्‍या शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे. 

मागील वर्षी आजच्या दिवशी धरणं पूर्ण क्षमतेनं  भरले होते. तर चालू हंगामात ते ९०.५४ टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास वेळ लागत असल्यानं पूर्व भागातील शेतकर्‍यांना यावर्षी पाण्याच्या संकटाला सामोरे जाण्याची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असताना उजनी धरण क्षेत्रात मात्र पावसाची वाणवा असल्यानं दौंडवरून येणारा पाणी विसर्ग सध्या कमी आहे. पावसाची स्थिती अशीच राहीली तर उजनी यावर्षी पूर्ण  क्षमतेने भरण्याची शक्यता धुसर होणार असुन शेतकर्‍याला मात्र आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची चिंता जाणकारातुन व्यक्त करण्यात आली होती.  मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उजनी धरणातील पाणी साठा पुन्हा वाढू लागला आहे. असाच पाऊस राहिला तर धरणं १०० टक्के भरण्यास वेळ लागणार नाही. यामुळे पुणे जिल्हातील गावांसह सोलापूरचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. 

बुधवार दिनांक २९ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेपर्यंतच्या उजनी धरणात ९०.५४ टक्के इतके पाणी आहे. धरणाची पाणी पातळी ४९६.३९५ मीटर इतकी असून, उपयुक्त पाणीसाठा ४८.५० टीएमसी इतका आहे. तर उजनी धरणातील सिना - माढा बोगदा २२२ क्युसेस व दहिगाव एल आय एस फाटा ६३ क्युसेसने विसर्ग सुरू असून सध्या उजनीतून २८५ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. तर उप कॅनल व मुख्य कॅनलमधून पाणी विसर्ग सध्या बंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीDamधरणRainपाऊस