शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

खंडाळ्यातील एस वळणावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 14:51 IST

खंडाळ्यातील एस वळणावरील भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

ठळक मुद्देखंडाळ्यातील एस वळणावरील भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

शिरवळ - खंडाळा गावच्या हद्दीतील धोकादायक एस वळणावरील अपघाताची मालिका संपत नाही आहे. हे वळण काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असतानाच आणि भूमीपूजनाच्या आदल्या दिवशीच या वळणावर दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे.  शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातातमृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबात अधिक माहिती अशी की, भवर आणि चव्हाण हे दोघे दुचाकीवरून सुरूरहून म्हावशी, ता. खंडाळा येथे निघाले होते. एस वळणावर पोहोचल्यानंतर पुढे निघालेल्या अज्ञात वाहनाला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

दरम्यान, या एस वळणावर आत्तापर्यंत 76 जणांचा बळी गेला होता. त्यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव टाकण्यात आला होता. अखेर हे वळण काढण्याचा शासन पातळीवर निर्णय झाल्यानंतर त्याचे भूमिपूजन रविवार 23 रोजी होणार आहे. असे असताना या एस वळणाच्या भूमीपूजनाच्या आदल्या दिवशीच  या वळणाने दोघांचे बळी घेतल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने केवळ भूमीपूजन करून न थांबता तत्काळ एस वळण काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी यानिमित्ताने नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेDeathमृत्यू