शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

पती-पत्नीच्या भांडणात आईला वाचवताना दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 09:36 IST

खाणीत उडी घेत आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न 

ठळक मुद्देयाचवेळी पती अतुल  यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेत तिला   पाण्याबाहेर काढले. पण या तणावात दोन्ही मुलांचा  पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बारामती/पुणे - पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतलेल्या आईला वाचवताना दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपळी (ता. बारामती ) येथे हि घटना घडली. या घटनेत ज्या आईला वाचवण्यासाठी मुलांनी पाण्यात उडी घेतली, त्या आईला मात्र पतीने सुखरूप बाहेर काढले आहे. 

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यानुसार पती-पत्नीच्या भांडणातून  रागाच्या भरात हि घटना घडली आहे. शनिवारी (दि 29) पहाटे तीन च्या सुमारास हि घटना घडली. पहाटे येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी (दोघे रा.पिंपळी, ता. बारामती ) या पती पत्नी मध्ये भांडण  झाले. त्यामुळे विवाहिता  रागाच्या भरात आत्महत्या करण्याचा निर्णय घेत  पिंपळी येथील  खाणीच्या पाण्याच्या दिशेने निघाली. खाणीच्या ठिकाणी पोहचल्यावर रागात विवाहितेने खाणीच्या पाण्यात उडी देखील मारली. मात्र, याच वेळी आईला पाहण्यासाठी  त्यांची दोन मुले दिव्या (वय 4) व शौर्य (वय 2)हे दोघे पाठोपाठ आले होते. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात  ही दोन्ही मुले एकापाठोपाठ पाण्यात पडली. 

याचवेळी पती अतुल यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेत तिला पाण्याबाहेर काढले. पण या तणावात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुले लहान असल्याने त्यांना वाचविण्याची संधी मिळाली नाही. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेनंतर या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घटनेनंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन चिमुकल्यांचा झालेला शेवट आज अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीdrowningपाण्यात बुडणेPuneपुणेBaramatiबारामती