शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतामध्ये पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्याच्या प्रयत्नात : नरेंद्र बत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 19:12 IST

प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देशालेय, महाविद्यालयीन मुला-मुलींमध्ये हॉकी खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा प्रयत्न : बत्रालेटस ब्रिंग बॅक द ओल्ड ग्लोरी हे आम्ही महाराष्ट्राचे ब्रीद वाक्य केले आहे : हितेन जैन

पुणे : फाईव्ह अ साईड (मिक्स हॉकी) हॉकी आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये प्रत्येक गावात आणि शहरात  प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हॉकी स्पर्धेच्या निमित्ताने बत्रा पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, फाईव्ह अ साईड हॉकी मिक्स ठेवण्याचा उद्देश असा आहे की काही वेळेस पुरुष चांगले खेळतात त्यावेळी महिलांचा खेळ होत नाही. या स्पर्धेमुळे पुरुषांबरोबर खेळून महिलांच्या खेळामध्येसुद्धा सुधारणा करण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. पुरुष व महिला एकत्र खेळल्यामुळे महिलांमधील आत्मविश्वासही वाढविण्यास मदत होईल.  यामुळे शालेय व महाविद्यालयीन मुला-मुलींमध्ये हॉकी खेळाची लोकप्रियता वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल. फाईव्ह अ साईड हॉकीसाठी मोठ्या मैदानाची आवश्यकता नाही. ही बागेत, शाळेतील आणि महाविद्यालयांतील लहान उद्यानांसह आपल्या सोसायटीमध्येसुद्धा खेळता येणार आहे. सध्या भारतीय महिला व पुरुष वरिष्ठ संघांची कामगिरी कौतुकास्पद आहे. नुकतेच त्यांनी आशियाई चषक जिंकले आहे. आगामी राष्ट्रकूल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी दोन्ही संघांचे नियोजन आमच्याकडे तयार आहे. दोन्ही संघ काही मित्रात्वाचे सामने खेळाण्यासाठी परदेशात जाणार आहेत. आमचा मुख्य उद्देश आगामी स्पर्धांमध्ये असा राहणार आहे की आमचे दोन्ही संघ चांगल्या खेळाचे प्रयत्न करून उपांत्य फेरीपर्यंत पोहोचतील असे त्यांचे सरावांचे नियोजन ठेवण्यात आले आहे. समजा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरला तर निदान तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी त्याने खेळावे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघ मानांकनात भारताने अव्वल तीनमध्ये रहावे अशी आमचे प्रयत्न राहतील. 

भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असलेले बत्रा यांना पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. २७, २८, २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे. २९ तारखेला आपल्याला कळेलच की कोण-कोण कोणत्या कोणत्या पदासाठी उमेदवारी अर्ज भरेल. गेल्या दोन वर्षांत विविध स्पर्धांना संघ पाठविण्याच्या व्यतिरिक्त सध्याचे असलेले अध्यक्ष यांनी कोणतेही कार्य केलेले नाही. भारतीय आॅलिम्पिक संघाच्या माध्यमातून देशामध्ये जास्तीत जास्त क्रीडा संस्कृती टिकविण्यासाठी अनेक उपाययोजना करता येऊ शकतात पण याबाबतीत काहीही झालेले नाही. त्यामुळे त्या समितीवर योग्य नियोजन व अचूक निर्णय घेणारीच व्यक्तीच यायला हवी.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा उद्देश असा आहे की, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त हॉकीचे खेळाडू (मुले-मुली) तयार व्हावीत आणि त्यांनी भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करावे. फाईव्ह अ साईड हॉकीमुळे शालेय आणि महाविद्यालयीन मुला-मुलींना हॉकीचा आनंद नक्कीच लुटता येणार आहे. त्यामाध्यमातून महाराष्ट्रामध्येसुद्धा पूर्वीचे हॉकीचे दिवस येतील असा आम्ही प्रयत्न करणार आहे. यामुळे हॉकीची लोकप्रियता पुन्हा वाढेल. औरंगाबादमध्ये आम्ही घेतलेल्या बैठकीमध्ये काही निर्णयसुद्धा घेतले आहेत की ज्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये हॉकीची मैदाने तयार होतील. लेटस ब्रिंग बॅक द ओल्ड ग्लोरी हे आम्ही महाराष्ट्राचे ब्रीद वाक्य केले आहे.- हितेन जैन, अध्यक्ष, हॉकी महाराष्ट्र 

टॅग्स :HockeyहॉकीPuneपुणेSportsक्रीडा