शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

ट्रॉमा सेंटर, हेलिपॅड धूळ खात; शासन उदासीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 02:20 IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांसाठी केली उभारणी

वडगाव मावळ : पुणे- href='http://www.lokmat.com/topics/mumbai/'>मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार मिळण्यासाठी शासनाने ७० लाख रुपये खर्च करून ओझर्डे गावच्या हद्दीत नऊ एकर जागेवर ट्रॉमा सेंटर व हेलिपॅडची उभारणी केली. गेल्या चार वर्षांपासून ही इमारत धूळ खात आहे. याबाबत शासनाला कधी जाग येणार, असा प्र्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.मुंबई-पुणे हा ९३ किलोमीटर लांबीचा महामार्ग २००२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. हा मार्ग उपयुक्त आणि सोईचा असला तरी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे या मार्गावर अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हजारो प्रवाशांचे बळी गेले आहेत.खोपोली व कळंबोलीदरम्यान होणाºया अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कळंबोली तर किवळे ते खंडाळादरम्यानच्या अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालय असे दोनच पर्याय आहेत. परंतु या दोन्ही ठिकाणी जखमींना नेण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. प्राथमिक उपचाराविना अनेक वेळा जखमींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.महामार्गावर अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उभारलेल्या ट्रामा सेंटर प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अपघातातील जखमींची गैरसोय होत आहे. हस्तांतराच्या वादात हा प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.शासनाला कधी जाग येणारगेल्या चार वर्षांपासून ही इमारत बांधून धूळ खात आहे. इमारतीला गवताचा वेढा आहे. हेलीपॅड उखडले आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळत नसल्याने मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सोळा वर्षांत बळींची संख्या काही हजारांवर गेली आहे. अजून किती बळी गेल्यावर हे सेंटर कार्यान्वित करण्यासाठी शासनाला जाग येईल, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघात